महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागामध्ये मराठी कॉलेज प्रलंबितच

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला दोन वर्षे झाल्यानंतरही पदवी अभ्यासक्रमांचे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची राज्य सरकारला चिंता आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांतील सीमाप्रश्न ऐरणीवर आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितील विद्यापीठाचे कुलसचिव आणि उच्च शिक्षण संचालक अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. राज्य सरकारच्या सूचनेनुसार सरकारी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी पाच एकर जागा देण्याचीही तयारीही स्थानिक प्रशासनाने दर्शवली होती. त्यादृष्टीने समितीने आपला अहवालही विद्यापीठ आणि राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.

मात्र, त्यानंरही पदवी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयाला मुहूर्त मिळाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिनोली येथे एक केंद्र सुरू असून, त्यातून विद्यार्थ्यांना कौशल्यांवर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. याबाबत अधिक माहितीसाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

हेही वाचा :  Career Tips: यशस्वी करिअरसाठी योग्य निर्णय महत्वाचा, या ५ टिप्स करा फॉलो

शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

नवीन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत सरकारी निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्वतंत्र महाविद्यालय स्थापन केले नाही. मात्र, शिनोली येथील केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यांवर आधारित दोन अभ्यासक्रम साधारण दोन वर्षांपासून सुरू आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. त्याचप्रमाणे सीमाभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत आणि होस्टेल सुविधा दिली आहे.
– डॉ. व्ही. एन. शिंदे , कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

सीमावर्ती भागात नवे महाविद्यालय सुरू करण्याची जबाबदारी पूर्णपणे शिवाजी विद्यापीठाची होती. त्या दृष्टीने मंत्री महोदयांसोबत समितीच्या सदस्यांच्या बैठका झाल्या. मंत्री महोदयांनीही जागेची पाहणी केली होती. त्या वेळी या महाविद्यालयाच्या संपूर्ण नियंत्रण आणि देखभालीची जबाबदारी शिवाजी विद्यापीठावर निश्चित करण्यात आली होती.
– डॉ. धनराज माने, तत्कालीन संचालक, उच्च शिक्षण संचालनालय

OBC Students Hostel: ओबीसी वसतिगृहांसाठी ३२ जिल्ह्यांत जागा मिळेना!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …