MPSC: ‘सी-सॅट’ गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याबाबतचा अहवाल प्रलंबितच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अनिवार्य असलेला ‘सी-सॅट’ विषय केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याबाबत नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे अहवाल सादर करण्यात येत नसल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य होण्याबाबत अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे, असा सवाल संतप्त उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांमध्ये ‘सी-सॅट’ विषय केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरला जातो. मात्र, ‘एमपीएससी’ने ‘सी-सॅट’ विषय अनिवार्य केला असून, त्याचे गुण अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येतात. याला राज्यभरातील उमेदवारांकडून विरोध करण्यात येत आहे. विविध संघटनांनीही ‘यूपीएससी’च्या धर्तीवर ‘सी-सॅट’ विषयाचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे. मात्र, ‘एमपीएससी’ने त्या संदर्भात निर्णय घेतला नाही. याबाबत उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी समितीला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. आता मार्च महिना संपायला आला तरीही समितीने अहवाल सादर केला नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. समितीने दिलेली वेळ का पाळली नाही, समितीकडून होत असलेल्या विलंबाचा परिणाम पुढील निर्णयांवर होणार असूनही ‘एमपीएससी’कडून समितीकडे पाठपुरावा का केला जात नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :  MPSC: महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा २०२१ साठी जागांमध्ये वाढ

”सी-सॅट’ पात्रतेसाठीच ग्राह्य धरण्याचा निर्णय होत नसल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील शेकडो उमेदवारांचे नुकसान होत आहे. ‘एमपीएससी’ने तातडीने कार्यवाही करून बऱ्याच वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावून उमेदवारांना दिलासा द्यायला हवा. ‘यूपीएससी’च्या कार्यपद्धतीनुसार काम केले जात असल्याचे ‘एमपीएससी’कडून वारंवार सांगितले जाते. मात्र, ‘सी-सॅट’च्या बाबत एवढी दिरंगाई कशासाठी, हा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही,’ असे एमपीएससी स्टुडंट राइट्सचे महेश बडे यांनी सांगितले.

‘एमपीएससी’ला गांभीर्य नाही का?

राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये समिती नियुक्त केली होती. पाच महिने उलटून गेल्यानंतरही अहवाल सादरच केलेला नाही. हा विषय केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येत नसल्याने, शहरी आणि ग्रामीण भागात पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊन, राज्य सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत आहे. याउलट व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना फायदा होत आहे. अशा परिस्थितीत पदभरती परीक्षेत सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी ‘सी-सॅट’ विषय केवळ पात्रतेसाठी धरण्याची आवश्यकता आहे. मात्र, समितीचा अहवाल प्रलंबित असल्याने, उमेदवारांच्या मागणीचे ‘एमपीएससी’ला गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा :  AIIMS Recruitment 2023: AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांच्या 147 जागांसाठी भरती

MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘येथे’ करा डाउनलोड

UPSC कडून कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर

Indian Army मध्ये एनसीसी कॅडेट्ससाठी विशेष प्रवेश

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …