एकाच कंपनीत नोकरी मिळाली
पदवीपर्यंत माझे आयुष्य खूप चांगले होते, मला कधीही कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. पण कॉलेज संपल्यावर आम्ही दोघेही एकाच कंपनीत नोकरी लागल्याचे कळल्यावर मी जरा घाबरलेच. कारण मला माझ्या कामात कॉलेजची स्पर्धा अजिबात नको होती. पण मला नोकरीची संधी देखील गमावायची नव्हती, म्हणून मी त्याच्याशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला. कदाचित तो एक चांगला निर्णय होता. कारण इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कॉलेजच्या सोबत्यासोबत ऑफिसमध्ये काम करणे सोपे झालं.
(वाचा :- 14 वर्षांनी शरद केळकरने मान्य केले बायकोच देते खर्चाला पैसे,लव्हस्टोरी वाचून तुम्ही ही म्हणाल जोडी नंबर 1)
मी त्याच्या प्रेमात पडले
एकत्र काम करत असताना आम्ही काही वेळात चांगले मित्र झालो. मला माझे काम आवडू लागले होते. त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे मीही खूप प्रभावित झाले होते. कारण तो मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा. मलाही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या. मला नेहमी वाटायचे माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हावं. पण तो पूर्णपणे वेगळा आहे. जसा वेळ गेला आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येत गेलो. तसंच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.
(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)
आम्ही लग्न करत आहोत
दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज केले. आज तो माझा सोलमेट बनला आहे.जेव्हापासून आम्ही एकत्र आहोत आमच्या आयुष्यात खूप आनंद आहोत. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत. मी आता खूपच आनंदी आहे.
(वाचा :- कोण होती Sanjay Duttची पहिली पत्नी Richa Sharma? कसा झाला या प्रेम कथेचा अंत)