रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट देखील घेतली.पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष (president) बाबा कांबळे यांनी वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना आंदोलन समितीतून वगळण्यात आले. तर दुसरीकडे बाबा शिंदे यांनी या संघटनांवर गंभीर आरोप केले आहे. (pune news a conflict stricks between richshaw associations)

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी जाणून बुजून पत्रकार बांधवांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल असा प्रयत्न करणे. समितीला अंधारात ठेवून परस्पर प्रादेशिक परिवहन अधिकारी व आंदोलनाशी संबंधित बाईक टॅक्सी (taxi news) बाबत इतर अधिकारी यांची परस्पर भेट घेऊन पारदर्शक कार्यपद्धतीच्या (pune rickshaw news) नियमांचा भंग करणे. तसेच 28 नोव्हेंबर 2022 रोजी चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यावर आंदोलनस्थळावरून मधूनच निघून जाणे. आंदोलनाची कायदेशीर जवाबदारी सर्वांची सामायिक असेल हे लेखी मान्य करून सुद्धा आंदोलनानंतर गुन्हे दाखल

हेही वाचा :  मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? नक्की गडबड तरी काय

बघतोय रिक्षवाला संघटनेनं काय म्हटलंय? 

झाल्यावर संताप करून त्याचे खापर इतरांवर फोडणे, व आंदोलनकर्त्यांमध्ये गैरसमज (conflicts between richshaw associations) पसरवणे. आंदोलनात ठरवून बोलायची वेळ दिलेली असताना 2-2 वेळा एक-एक तास भाषण केल्यामुळे इतर अनेकांना विशेषतः सामान्य रिक्षाचालकांना व्यक्त होण्याची संधी न मिळणे. आंदोलन समितीचा एकच फ्लेक्स लागेल हे ठरलेले असताना प्रादेशिक परिवहन विभाग परिसरात स्वतः चे अनेक फ्लेक्स लावून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणे व समिती मधील वातावरण दूषित करणे. आंदोलन समितीमध्ये वारंवार वैयक्तिक वाद उकरून काढून चर्चेचा स्तर खालावणे. असं नियमांचा उल्लंघन केल्याने त्यांना रिक्षा संघटनांच्या समितीतून वगळण्यात आले आहे अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.

हेही वाचा – शिर्डीत झाली चोरी; महिलेसोबत धक्कादायक प्रकार

रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नसून चुकीचा संदेश पसरवून 12 लाख रिक्षा चालकांच्या  जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही याबाबत आंदोलन समितीतील (protest) सर्व सभासद ठाम आहेत व त्यांच्यामध्ये एकजूट आहे तसेच कोणत्याही प्रकारची फूट नाही. यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाबा शिंदे यांच्या संघटनेचा समावेश नसेल, असं देखील यावेळी क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :  हर्षद मेहतापेक्षा खतरनाक खिलाडी, 14 वेळा लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीलाच सरकारने केलं बॅन!

हेही वाचा – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गुन्हेगारांना शिक्षेऐवजी ऐशोआराम?

बाबा कांबळे यांचे मतं

28 नोव्हेंबर रोजी सर्व रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद आंदोलन (rickshaw andolan) करून ते यशस्वी देखील केला. आमची संघटना या सहभागी झाल्याने हे आंदोलन यशस्वी झाला आहे. हे आंदोलन सुरू असताना काही बोगस संघटनांनी यात सहभाग घेतला आणि या आंदोलनाला हिंसक करण्यासाठी प्रयत्न प्रवुत्त केलं. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी का बोलतो ते थांबवलं. आणि मी माझ्या संघटनेतील रिक्षा चालकांना घेऊन तेथून निघून आलो.आणि जे बोगस संघटना आहे त्यांना काहीच करता आलं नाही म्हणून ते माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप करत आहे. पुण्यातील सर्व रिक्षा संघटना आहे माझ्याबरोबर असून आम्ही आज बैठक घेणार आहे.अस महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी म्हटलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …