लग्न केल्याचा आयुष्यभर होईल पश्चाताप आणि मॅरिड लाईफ होईल पार बरबाद, जर या 4 गोष्टींवर वेळीच दिलं नाही लक्ष..!

प्रत्येक वैवाहिक जीवनात चढ-उतार येत असतात यात काही शंकाच नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी जुळवून घेण्याचे किंवा सांभाळण्याचे कसब शिकून घ्यावे लागते. तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लहान वाटतात, परंतु त्यांचा आपल्या नात्यावर मोठा प्रभाव पडतो. दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफस्टाईलनुसार जगत असता आणि मग कालांतराने पार्टनर सोबतचे वैवाहिक आयुष्य खूप कंटाळवाणे वाटू लागते.

अनेक वेळा कामाच्या ताणामुळे एकमेकांवर खरे प्रेम असून सुद्धा तुमच्या आणि जोडीदारातील अंतर वाढू लागते. त्याचा परिणाम शेवटी घटस्फोटावर येऊन थांबतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे नाते जपायचे असेल आणि त्यातला आत्मा गमावू द्यायचा नसेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे ज्या चूका सांगतो आहोत त्या करणे कटाक्षाने टाळा. (फोटो सौजन्य :- iStock)

भावनिकदृष्ट्या पार्टनर सोबत नसणे

भावनिकदृष्ट्या पार्टनर सोबत नसणे

वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर पती-पत्नीमध्ये एक इमोशनल बॉन्ड तयार होतो. जो खूप मजबूत असतो. तुम्ही जर भावनिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून आहात तर त्यात काहीही चुकीचे नाही. पण जर तुमच्या जोडीदारात अचानक बदल झालेला तुम्हाला दिसला, जसे की कामाच्या निमित्ताने का होईना पण कारणे देऊन तो तुमच्यापासून अंतर राखत असेल आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा सोबत नसेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कधीतरी चुकून अशा गोष्टी पार्टनरकडून घडत असतील तर त्याचा इश्यू करू नये, पण सतत हेच होत असेल तर यामुळे तुमच्या नात्यात अंतर निर्माण होऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबाबत ताबडतोब बोलले पाहिजे.

हेही वाचा :  Abdul Makki Global Terrorist: मक्की जागतिक दहशतवादी! चीनचा पाकिस्तानला धक्का; भारताला फायदा

(वाचा :- बायकोशी झालेलं भांडण न संपवता तुम्हीही झोपता? मग आहात भयंकर वाटेवर, या 5 लोकांचे अनुभव ऐकून फुटेल दरदरून घाम)

प्रोफेशनल लाईफचे प्रेशर

प्रोफेशनल लाईफचे प्रेशर

वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासोबतच जोडीदारासोबत एक चांगला वेळ घालवणेही खूप महत्त्वाचे आहे. पण अनेक वेळा तुम्ही कामात इतके मग्न होता की तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहीत धरू लागता. तुमचा असा विश्वास असतो की तुमचे प्रेम हे एकदम घट्ट आहे आणि त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. परंतु हा भ्रम तुम्हाला गाफील ठेवू शकतो आणि हळूहळू एकमेकांपासून दूर करू शकतो. वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनात संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील. कामासोबतच तुमच्या जोडीदारासाठी रोज वेळ काढावा लागेल.

(वाचा :- सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप)

आपला राग पार्टनर वर काढणे

आपला राग पार्टनर वर काढणे

आजकाल जीवनशैली अशी झाली आहे की अनेकवेळा तुम्ही तुमच्या कामाचा राग जोडीदारावर काढता, याचा तुमच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या. तुमचा जोडीदारही तुमच्यावर अनेकदा चिडचिड करत असेल आणि काहीही विचारल्यावर भडकत असेल, तर अशावेळी तुम्ही देखील सावध राहण्याची गरज आहे. त्यांची सवय किंवा कामाचा दबाव समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याऐवजी, त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडून त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर यातून काही तोडगा निघाला नाही तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजावून सांगावे लागेल की तुम्ही त्याचे हे वागणे सहन करू शकत नाही. यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला गांभीर्याने घेईल आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :  'Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही'; शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

(वाचा :- वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर)

शारीरिक जवळीक बिघडणे

शारीरिक जवळीक बिघडणे

वैवाहिक जीवनात काही काळानंतर जोडीदारांमधील शारीरिक जवळीक कमी होऊ लागते, ज्यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण होते. विवाहित जोडपे हळूहळू घर-कुटुंब आणि मुलांमध्ये इतके व्यस्त होतात की ते लैंगिक जीवनाकडे दुर्लक्ष करू लागतात. याचा तुमच्या नात्यावर काहीही परिणाम होत नाही असे तुम्हाला वाटत असले तरी यामुळे नात्यातील एक फ्रेशनेस निघून जातो. अशा परिस्थितीत, पती-पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ठराविक काळाने ट्रीपला जावे, मुव्हीला जावे, काहीच नाही तर डिनर डेटला जावे. पण स्वत:ला वेळ द्यावा. यामुळे तुमच्यातील प्रेम आणि शारीरिक जवळीक टिकून राहिल.

(वाचा :- लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय)

संशयी होऊ नका

संशयी होऊ नका

कोणत्याही नात्यासाठी संशय हा खूप वाईट आहे ही गोष्ट तुम्ही सुद्धा मान्य कराल. अनेकदा जोडीदाराच्या वागण्यात बदल होतो,वा सहसा तो जी गोष्ट करत नाही ती गोष्ट करतो. अशावेळी लगेच त्याच्यावर संशय न घेता, तुम्ही स्वत: नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लगेच संशय घेणे म्हणजे आरोप करण्यासारखे असते आणि यामुळे तुमच्यात ठिणगी पडू शकते. अनेकदा बायका वा नवरे सुद्धा हळूहळू संशयी होऊ लागतात. अनेक नात्यात काही काळ लोटल्यावर हा बदल दिसतो. तुमच्यात हा बदल होऊ नये म्हणून काळजी घ्या आणि तुमचा जोडीदार सुद्धा असा बनू नये म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवा. जर तो संशयखोर होत असले तर वेळीच त्याला या गोष्टीची जाणीव करून द्या.

हेही वाचा :  डेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral

(वाचा :- माझी कहाणी : मी एका मुलीच्या प्रेमात ठार वेडा झालोय, पण तिचं सत्य समजल्यापासून मला मोठा धक्काच बसलाय, काय करू?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …