<p style="text-align: justify;"><strong>IND W vs AUS W World Cup 2022 :</strong> महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 277 धावा केल्या आहे. सात गड्यांच्या मोबदल्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. या 277 धावांमध्ये यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहेत.</p>
<p style="text-align: justify;">भारतीय संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवायचे असल्यास कामगिरीत सुधारणा करणे महत्वाचे आहे. आज बलाढ्य असमाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची लढत होत आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली कामगिरी करत 278 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले आहे. त्यामुळे आता भारतीय महिला गोलंदाजी कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p style="text-align: justify;"><br /><img src="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/c47126ebf054a74e800573ad3374802d_original.jfif" width="542" height="361" /></p>
<p style="text-align: justify;">एका क्षणी भारतीय संघाने 6 षटकांत केवळ 28 धावांत शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मिताली राज आणि यस्तिका भाटिया यांनी तिसऱ्या विकेटसाठी 25.4 षटकांत 130 धावांची भागीदारी केली. मिताली राजने 96 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 83 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. </p>
<p style="text-align: justify;"><br /><img src="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/d8399edc9db28945ea34eab95caf4f7b_original.jfif" width="537" height="358" /></p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत. या सामन्यांत फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले नाही. भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चुरशीच्या मालिकेत पराभूत व्हावे लागले; पण भारताने त्यांची सलग 26 विजयांची मालिका खंडित केली होती. भारतीय फलंदाजांना एकत्रितपणे चांगली कामगिरी करता आलेली नाही.</p>
Check Also
विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’
Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …
IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?
IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …