HSC Exam 2022: दहावी, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडूनच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावी, बारावी परीक्षेतील (ssc hsc exam paper checking) उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे, अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी मंडळाने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविणाऱ्या संस्थांना कारवाईची तंबी दिली आहे.

विनाअनुदानित शिक्षकांनी अनुदानाच्या मागणीसाठी विविध टप्प्यात आंदोलन केले. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियेला गती आलेली नाही. विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक गठ्ठे तसेच पडून आहेत. विनाअनुदानित शाळा कृती समिती, समन्वय संघ आदींनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार असेल, असे मंडळाला कळविल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक शिक्षक उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने उत्तरपत्रिकांची तपासणीची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, निकाल लांबणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचवेळी मंडळाने यापूर्वीच स्पष्ट करत उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा दिला होता. यामुळे गठ्ठे परत न पाठवता संबंधित शाळा, महाविद्यालयांमध्येच ठेवत काही शिक्षकांनी तपासणीकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा :  दहावी, बारावी परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नाहीच; बोर्डाने केले स्पष्ट

औरंगाबाद विभागात एक लाख ६९ हजार २८९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागात ४०८ मुख्य केंद्र तर ८५५ उपकेंद्रांवर परीक्षा होत आहे. दहावीची परीक्षा विभागातून एक लाख ८५ हजार ४३४ विद्यार्थी देत आहेत. विभागातील दोन हजार ४४७ शाळांमधून हे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. उत्तरपत्रिकांची संख्या तीस ते पत्तीस लाखांच्या आसपास असते, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना मंडळाकडे परत आलेले नाहीत. याबाबत मुख्याध्यापक, प्राचार्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. गठ्ठे परत पाठविणाऱ्या संस्थावर मंडळ योग्य ती कारवाई करेल.
– आर. पी. पाटील, विभागीय सचिव,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

राज्यातील सुमारे सहा हजार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्याचे व सेवा संरक्षण देण्याचे दिलेले आश्वासन राज्य सरकारने अद्यापही पाळलेले नाही. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देत, या शाळेतील कार्यरत शिक्षकांनी यंदा दहावी व बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे निकालावर प्रचंड मोठा फरक पडणार आहे. निकाल उशीरा लागल्यास त्यासाठी सरकारच जबाबदार असेल.

हेही वाचा :  मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध

– रवींद्र तम्मेवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती

गोदामातील परीक्षा रडारवर; कॉलेजची मान्यता रद्दची प्रक्रिया सुरू

धक्कादायक! ‘या’ शाळेत दहावी, बारावीचे सर्वच विद्यार्थी नापास
ऊन वाढले मात्र नगरमधील शाळांच्या वेळेचा पेच कायम!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …