Metro : कसारा, पनवेल, पालघर मधून मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार; रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी जबरदस्त प्लान

Fast Metro in Mumbai : घरांच्या वाढत्या किंमतींमुळे आता मुंबई बाहेर लोकवस्ती वाढू लागली आहे. कसारा, पनवेल पासून ते अगदी पालघरपर्यंत लोक रहायला जावू लागले आहेत. मात्र, इथे राहणारे लाखो प्रवासी कामानिमित्ताने रोज मुंबईतच येत असतात. सध्या वाहतुकीच्या सुविधा पाहता अनेकांचा अर्ध्याहून अधिक वेळ हा प्रवासातच जातो. लवकरच चाकरमान्यांची या त्रासदायक प्रवासातून  सुटका होणार आहे.  कसारा, पनवेल, पालघर मधून मुंबई फक्त अर्ध्या तासात गाठता येणार आहे. रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी  (rapid transport) जबरदस्त प्लान तयार केला जात आहे. 

मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. या रॅपिड ट्रान्सपोर्टमुळे मुंबईबाहेरची शहरं गाठण्यासाठीची मोठी कसरत आता टळणार आहे. कर्जत, कसारा, पनवेल, पालघर फक्त अर्ध्या तासात गाठता येईल. ते देखील मेट्रोने. महामुंबईच्या वाहतुकीला वेग देण्यासाठी रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्थातच जलद मेट्रोची चाचपणी झाल्याचं समजते.

कर्जत, कसारा, पनवेल, पालघर, ठाणे-डोंबिवली ही लांब अंतरावरची स्टेशन्स मेट्रोने जोडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिका-यांनी दिल्लीच्या जलद मेट्रो प्रकल्पालाही भेट दिली. यावेळी जलद मेट्रोचा नेमका उपयोग जाणून घेतल्याचं व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंनी म्हटले. दिल्लीतील हा जलद मेट्रो प्रकल्प यशस्वी ठरला आहे. या जलद मेट्रोचा ताशी वेग 180 किमी प्रतितास असा आहे. यामुळे हा जलद मेट्रो प्रकल्प लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरु शकतो. 

हेही वाचा :  'पावनखिंड'नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत 'शेर शिवाजी' | chhatrapati shivaji maharaj digpal lanjekar upcoming movie sher shivraj

मुंबईतील बहुतांश मेट्रो कॉरिडॉर बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. मुंबईत मेट्रोची फक्त एक लाईन म्हणजेच वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर किंवा ब्लू लाईन कार्यरत होती. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  2 A आणि 7 चे उद्घाटन झाले. लाईन २ A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करतो. सध्या मेट्रोच्या तीन मार्गिका सुरू झाल्या आहेत. 

तर, मुंबईत जवळपास आठ मार्गिकांचे काम सुरू आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्याअंतर्गत  एकूण 14 मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे मुंबई शहर, उपनगरासह महामुंबई क्षेत्र एकमेकांशी जोडले जात आहे. यात मुंबईच्या भुयारी मेट्रो प्रकल्पासह ठाणे मेट्रो प्रकल्पाचा देखील समावेश आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ

गोव्यात पोलिसांना एकाच घरात दोन भावांचे मृतदेह आढळले होते. 29 आणि 27 वर्षीय भावांच्या निधनाची …

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …