पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपाने केलेल्या कामगिरीबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे.
पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालामध्ये ४ राज्यात भाजपने केलेल्या कामगिरीमुळे पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पुण्यातील नळ स्टॉप येथे गिरीश खत्री आणि कार्यकर्त्यांनी बुलडोजरवरून साखर आणि पेढे वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला.
देशभरात पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशाबद्दल पुण्यातील भाजपा कार्यालया बाहेर लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ‘युपी,गोवा झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते गिरीष खत्री म्हणाले, विरोधकांनी जो प्रचार केला होता की योगी आदित्यनाथ बुलडोजर वाले आहेत, तर आता जनतेने योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सांगितलं आहे की तुम्ही असंच अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आपला बुलडोजर चालू द्या आणि विकासकामं सुरू ठेवा, हेच जनतेने मतदानाच्या माध्यमातून सांगितलं आहे. असाच लोकांचं प्रेम आणि विश्वास भारतीय जनता पार्टीसाठी राहावं हीच प्रार्थना.
निवडणूक विषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे.