बांगलादेश दौरा पंतसाठी ‘लास्ट चान्स?’खराब प्रदर्शन केल्यास पडावे लागू शकते टीम इंडियातून बाहेर

Rishabh Pant in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India Tour of Bangladesh) आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करत आहेत, पण सर्वांच्या नजरा मात्र विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) असतील. कारण एक महत्त्वाचा खेळाडू असूनही मागील बऱ्याच काळापासून पंत खराब फॉर्मात आहे, टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यातही पंतने निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे आता बांगलादेश दौऱ्यातही तो फ्लॉप राहिल्यास टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

ऋषभ पंत हा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये बराच स्ट्रगल करत असल्याचं दिसत आहे. त्यात बांगलादेशचा संघ सध्या खास फॉर्मात नसल्याने ऋषभ पंतला पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी आहे. पण तो यात अयशस्वी झाल्यास त्याला मर्यादीत षटकांसाठीच्या भारतीय संघातून बाहेर जावे लागू शकते. दरम्यान पंतवर होणाऱ्या या साऱ्या टीकांवर उत्तर देताना तो म्हणाला होता की, तो फक्त 25 वर्षांचा आहे, जेव्हा तो 30-32 वर्षांचा होईल, तेव्हा त्याच्या कामगिरीची तुलना इतरांसोबत व्हायला हवी. ऋषभ पंतच्या या वक्तव्यानंतर तो दडपणाखाली असल्याची चर्चा होत असून अशामध्ये आता त्याचा परफॉर्मन्स बांगलादेशविरुजद्ध कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा :  Sarfaraz Khan धाकटा भाऊही दमदार फॉर्मात, 34 चौकार आणि 9 षटकारांसह ठोकल्या 339 धावा

संजू आणि ईशानही रेसमध्ये

सध्या भारतीय संघात बरेच युवा खेळाडू असून संजू सॅमसन आणि ईशान किशन या यष्टीरक्षक फलंदाजांना फारशा संधी मिळालेल्या नाहीत. धोनीनंतर पंतच विकेकिपर म्हणून दिसत आहे. पण अलीकडे पंत सातत्याने मिळालेल्या संधी गमावत आहे. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत ऋषभ पंत फ्लॉप ठरल्यास त्याला टीम इंडियातून वगळले जाऊ शकते, असं मत काही क्रिकेट तज्ज्ञ देत आहेत.

News Reels

आकडेवारी काय म्हणतेय?

मागील 9 डावांत ऋषभ पंतच्या बॅटमधून केवळ 96 धावा आल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 11 च्या खाली आहे. तर सर्वोच्च धावसंख्या 27 धावा इतकी आहे. पण पंतने कसोटी फॉर्मेटमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्याचं दिसून आलं आहे. असं असलं तरी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 34.60 च्या सरासरीने 865 धावा केल्या आहेत. तर 66 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 22.43 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …