“…तर मग आम्हाला आमचा विचार करावा लागेल,” अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले

Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याआधी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांना नाना पटोले यांना सुनावलं आहे. महाविकास आघाडीच्या सभेत आपण हा मुद्दा मांडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे?

“बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्या पक्षाशी युती करावी हा त्यांचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभारविरोधात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहोत, आमची ही लढाई सुरुच राहिल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या या मुद्द्यावर मविआच्या बैठकीत चर्चा करु. काँग्रेस पक्षातून जर कोणी स्थानिक पातळीवर भाजपाशी हातमिळवणी केली तर त्यांच्यावर मात्र पक्ष कारवाई करेल,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

अजित पवारांची प्रतिक्रिया

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्यं करतात. कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडत आहे. चॅनेल किंवा मीडियामध्ये जाण्याऐवजी त्यांनी जयंत पाटील, मी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलायला हवं होतं. यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका हातानेच वाजत नाही. अशा वक्तव्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत,” असं अजित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत मी हा मुद्दा मांडणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. 

हेही वाचा :  'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

मला काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलायचं नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तो त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावा असं सांगत अजित पवार यांनी जास्त भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे बाजार समित्यामध्ये आघाडी झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 

“लातूर तालुक्यात महाविकास आघाडीला विचारलं जात नाही, काँग्रेस निर्णय घेतं अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांना मी जयंत पाटील यांच्या कानावर घालण्यास सांगितलं आहे. तुम्ही जर आम्हाला सोबत घेणार नसाल तर आमचा आम्हाला विचार करावा लागेल, मग इतरांना घेऊन पुढे जायचं का? अशी विचारणा करा असं मी त्यांना सांगितलं आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …