Bhaskar Jadhav: …म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Budget 2023 : शिदे फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. तर, सत्ताधारी देखील तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. अधिवेशनाच्या या गदारोळात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत  भास्कर जाधव यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवल्याचे दिसत आहे. 

भास्कर जाधव का झाले नतमस्तक?

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी उद्विग्न होत तीन दिवस आधीच अधिवेशनाचा निरोप घेतला. जाता जात विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला. सभागृहात बोलू दिलं जात नसल्यानं अधिवेशनात हजेरी लावून काही उपयोग नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र, अधिवेशानतून बाहरे पडताना भास्कर जाधव हे विधान भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

अवकाळी पावसामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पावासामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत लक्षवेधी मांडली असता बोलू दिले जात नाही. यामुळे अधिवेशन संपेपर्यंत मी पुन्हा सभागृहात येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. अशी खंत भास्कर जाधव व्यक्त केली.

हेही वाचा :  पती आणि मुलांचे हात-पाय बांधून डोळ्यांदेखत तीन महिलांवर सामूहिक बलात्कार; अडीच तास सुरु होतं दुष्कर्म, अन् नंतर...

टेक्स्टटाईल्स आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णयावरुन वाद

मुंबईचं टेक्सटाईल आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा केंद्र सरकरानं निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असेल तर तो हाणून पाडा असं जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटलंय. तर टेक्स्टटाईल्स आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय झालेला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

विरोधी पक्षाचा सभात्याग

अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतक-याला सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षाने विधानसभेत केली. संपामुळे कर्मचारी पंचनामे करण्यास येत नव्हते. हा मुद्दा देखील अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्यांनी सत्ताधारी आमदार वाद निर्माण करत आहेत असं अजित पवार म्हणाले. सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याग केला होता.

पावसामुळे आमदारांची पळापळ

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पावसाळी अधिवेशनाचा फील आला. अचानक आलेल्या पावसामुळे आमदार, सचिवांची चांगलीच पळापळ झाली. आमदारांना सभागृहात पोहोचताना छत्रीचा आधार घ्यावा लागला. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …