छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगत भगतसिंह कोशायरी यांनी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्याच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यपालांचा यावेळी निषेध करण्यात आला.
महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्राला सातत्याने सांगण्याचं काम राज्यपाल कोश्यारी करतात. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी बाब आहे असं मत प्रा. मधुकर पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा दिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. समर्थ रामदास शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी होते. गुरुंचे आपल्या समाजात मोठे स्थान असते. समर्थांना शिवाजी महाराज म्हणाले होते की या राज्याची चावी मी तुम्हाला देतो, असा उल्लेख कोश्यारी यांनी आपल्या भाषणात केल्याने वाद निर्माण झाला होता.
या निषेध सभेच्या निमित्ताने प्रताप उर्फ भैय्या माने डॉ. प्रताप पाटील ,अमरसिंह राजपूत ,प्राचार्य डीआर मोरे, प्राचार्य पवार ,संजय जाधव , धैर्यशील पाटील, डॉ. भारती पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.