Russia-Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय परतले ; २४ तासांत १५ विमानं दाखल


परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती ; पुढील २४ तासांसाठी १३ विमानं नियोजित असल्याचंही सांगितलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Russia Ukraine War Live: रशियावरील निर्बंध हे युद्धाच्या घोषणेसारखे; पुतिन यांचे मोठे वक्तव्य

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, मागील २४ तासांमध्ये १५ विमानं भारतात पोहचली असून, ज्यामध्ये जवळपास २९०० भारतीयांना आणलं गेलं आहे. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० भारतीयांना घेऊन ६३ विमानं भारतात पोहचली आहेत. तर, पुढील २४ तासांसाठी आणखी १३ विमानं नियोजित करण्यात आलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत की युक्रेनमध्ये आणखी कित भारतीय आहेत. जे तेथे आहेत परंतु नोंदणीकृत नाहीत त्यांच्याशी दूतावास संपर्क करेल. आम्ही २९८ विद्यार्थ्यांना जवळच्या पिसोचिन येथे स्थलांतरित केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

हेही वाचा :  तुळशी आणि आवळ्याच्या ‘या’ सोप्या उपायाने पांढरे झालेले केस करा काळे!

तसेच, आम्ही येत्या काही तासांत पिसोचिन आणि खार्किवमधून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. आतापर्यंत आम्हाला माहित आहे की खार्किवमध्ये कोणीही शिल्लक नाही. आता आमचे संपूर्ण आणि मुख्य लक्ष्य सुमीवर आहे. आमच्यासमोर आव्हान कायम आहे. अशी देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती दिली गेली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …