“नवाब मलिक मंत्रिपदावर …”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली महत्वपूर्ण माहिती | After the NCP meeting, State President Jayant Patil interacted with the media msr 87


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी उद्या पत्र पाठवणार आहे, अशी देखील माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना बैठकीतील निर्णयाबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत आणि घेण्यात आलेल्या अन्य महत्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती दिली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “ बैठकीत पक्ष संघटनेच्याबाबतीत आणि राज्यातील वेगळ्या गोष्टींच्याबाबतीत वेगळ्या मुद्यांची चर्चा झाली. वेगळे विषय जे सध्या सुरू आहेत, त्याबाबत साधकबाधक चर्चा झाली.” तर, नवाब मलिक यांच्याबद्दल काही चर्चा झाली का? कारण मुंबई अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि मुंबई महापालिका निवडणूक आहे, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की “ नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि आज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. नवाब मलिक उपलब्ध नसल्याने पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे दोन कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासमवेत करतील. ”

हेही वाचा :  Manipur Violence: जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळलं; वयस्कर असल्याने कुटुंबाने सोडलं होतं मागे

तसेच, “नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या या इतरांना देण्याचं काम हे या दोन-चार दिवसांत पूर्ण होईल. नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे ते जिल्हे आणि त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचं आम्ही ठरवलं आहे.” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील –

याचबरोबर, “नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आहेत, आम्ही दोन कार्याध्यक्ष नेमतो आहोत. नरेंद्र राणे आणि महानगरपालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांना कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी देतोय. तसेच, नवाब मलिकांकडे दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद होतं. तिथे आता परभणीत धनंजय मुंडे हे पालकमंत्री असतील आणि गोंदियात प्राजक्त तनपुरे हे पालकमंत्री असतील, हा निर्णय आम्ही घेतला आहे. उद्याच मी मुख्यमंत्र्यांनी मी पत्र पाठवून आमच्या पक्षाकडून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना कळवला जाणार आहे, मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील. नवाब मलिकांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या विभागाचं काम पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळेच ही जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांना देण्याची आवश्यकता आहे.” असं देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :  बँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलय –

“नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलेलं आहे. अनिल देशमुखांनी अटक झाल्यावर स्वत:हून राजीनामा दिला. नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे, अशी आमची धारणा आहे. त्या पद्धतीने न्यायालयात लढाई सुरू आहे.तोपर्यंत त्याच्या विभागाचा भार हा दुसऱ्यांना सोपवला जात आहे, नवाब मलिक हे मंत्रिपदावर कायम राहतील.”

देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला –

तर पेनड्राईव्ह प्रकरणाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी, पेनड्राईव्हची सत्यता तपासली गेली पाहिजे. फॉरेन्सिक लॅबकडे ते पाठवले पाहिजेत आणि मग त्यावर बोललं पाहिजे. असं सांगितलं. याचबरोबर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असेल अस म्हटलंय, यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ”म्हणजे २०२४ पर्यंत ते येत नाहीत, आमचंच सरकार राहणार हे त्यांनी मान्य केलं. याबद्दल मी महाविकासघाडी तर्फे त्यांचे आभार मानतो.” अलं म्हणत टोला लगावला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …