मनोज जरांगेंना मुंबईत ‘नो एन्ट्री’? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम

Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. 

मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीस
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे,अशी भीती मुंबई पोलिसांनी नोटिशीत व्यक्त केलीय. खारघरमधील इंटनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आंदोलनासाठी संयुक्तिक राहिल, असंही या नोटिशीत पोलिसांनी सुचवलंय.

आझाद मैदानावर जरांगे ठाम
मात्र मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत. त्यामुळं सरकारला चांगलाच घाम फुटलाय. जरांगेंची समजूत काढण्यासाठी सरकारी शिष्टमंडळानं लोणावळ्यात त्यांची भेट घेतली, मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. आता मुख्यमंत्र्यांनीच तोडगा काढावा, अशी विनंती जरांगेंनी केलीय. तर जरांगेंनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

हेही वाचा :  अभिनेत्रीच्या तीन मुलांचे ३ बाप, तिघांसोबत राहून मुलांचे करते संगोपन

फसवून सही घेतली
एका अधिकाऱ्याने माझ्याकडून एका कागदावर सही घेतली, असं जरांगेंनी म्हटलं आहे. एक कागद मराठीत आणि दुसरा इंग्रजीत होता. मी ते वाचलंच नाही. कोर्टाचं कागदपत्रं असल्याचं सांगत माझ्याकडून सही घेतली. उपोषणाला इथे बसू नका, तिथे बसू नका असं त्यावर लिहिलेलं होतं. मी झोपेत असल्याने चुकून सही केली. पण सही घेतली असली तरी आझाद मैदानातच उपोषणाला बसणार आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी आपल्याकडून खोटं बोलून सही केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसंच जाहीरपणे अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे. 

दुसरीकडं सकल मराठा समाजानं आझाद मैदानात उपोषण आंदोलनासाठी स्टेज बांधायला सुरूवात केली होती. पोलिसांनी नोटीस पाठवून स्टेज बांधण्याचं काम थांबवलं. मात्र काहीही झालं तरी 26 जानेवारीला जरांगे आझाद मैदानात येणारच, असा निर्धार मराठा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय. यामुळे इकडं आड आणि तिकडं विहीर, अशी राज्य सरकारची अवस्था झालीय.

एकीकडं मनोज जरांगे आणि लाखो मराठा आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. तर दुसरीकडं मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. यातून मार्ग काढताना सरकारला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणाराय.

हेही वाचा :  कुणबी नोंदी महाराष्ट्रभर शोधा; मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमंतर शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …