पाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली, पती अरविंद स्विकार करणार?

Anju Return: राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतलीय. तिचा एक फोटोही समोर आला असून वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर  फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी (Nasrullah) लग्न केलं. पाकिस्तान (Pakistan) गेल्यानंतर अंजू जगभरात चर्चेत आली. भारतात परतल्यानंतर अंजू (Anju) सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पण सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अंजूचा पहिला पती अरविंद तिचा स्विकार करणार का? अरविंद आणि अंजूला दोन मुलं आहेत, पण पती आणि दोन मुलांना सोडून ती पाकिस्तानात गेली होती.

नसरुल्लाहशी केला निकाह
अंजू ही राजस्थानच्या अलवरमध्ये राहाते. अलवरमधल्या भिवाडी इथं अंजू पती अरविंद आणि दोन मुलांसह राहत होती. अंजू आणि अरविंदचं 17 वर्षांपूर्वी अरेंज्ड मॅरेज झालं. त्यांना दोन मुलं असून मोठ्या मुलीचं वय 15 थर लहान मुलाचं वय 7 वर्ष आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात गेली. पाकिस्तानामधल्या खैबर पख्तूनख्वामध्ये मित्र नसरुल्लाहबरोबर अंजूचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी निकालही केला. अंजू-नसरुल्लाहचे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले होते. अंजू आणि नसरुल्लाहाच्या प्री वेंडिगचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पाकिस्तानमध्येच हा व्हिडिओ शूट करण्यात आला.

हेही वाचा :  "...तर मग श्रीमंत व्यक्ती पंतप्रधान होतील", उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले "शिंदे गटाचा दावा नीचपणाचा आणि विकृत"

पाकिस्तानात स्विकारला इस्लाम
अंजू जुलैमध्ये फेसभूक फ्रेंड नसरुल्लाहला भेटायला पाकिस्तानात गेली. 34 वर्षांच्या अंजूने नसरुल्लाहशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्विकारला आणि नावही बदललं. अंजूने आपलं नाव फातिमा असं ठेवलं. 

पतीशी खोटं बोलून पाकिस्तानात
पाकिस्तानला जाण्यासाठी अंजूने आपल्या पती अरविंदला खोटं कारण सांगितलं होतं. जयपूरमध्ये एका मैत्रिणीला भेटायाल जात असल्याचं सांगून अंजू घरातून निघून गेली होती. तर ज्या कंपनीत अंजू काम करत होती, तिकडे तीने गोव्याला बहिणीकडे जात असल्याचं सांगितलं होतं.  पण नंतर मीडियात बातम्या आल्यानंतर अंजू जयपूरला न जाता पाकिस्तानला गेल्याचं अरविंदला कळलं. 

अंजू भारतात का आली?
अंजू कायमची भारतात आली आहे की पुन्हा पाकिस्तानात परतणार हे अदयाप स्पष्ट नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मिडियाला दिलेल्या एका मुलाखतीत नसरुल्लाहने एका मुलाखतीत अंजू आपल्या मुलांसाठी भारतात जाणार असल्याचं म्हटलं होतं. अंजूला आपण स्वत: वाघा बॉर्डरवर सोडायला जाणार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. मुलांसह अंजू पाकिस्तान आली तर आम्हाला आनंद आहे. पण तिला भारतातच रााहावं वाटलं तर ती राहू शकते तिची इच्छा आहे असंही नसरुल्लाहने स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा :  Karachi Mosque Attack: दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊनही पाकिस्तान सुधरेना! दिवसाढवळ्या मशिदीवर चढून हल्ला; VIDEO व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …