“आज मुस्लिमांची संख्या…”, व्हिडीओ शेअर करत कंगनाने केली The Kashmir Files पाहण्याची विनंती | kangana ranaut shared video urges to fans to watch vivek agnihotri film the kashmir files


कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना भारत-पाकिस्तान फाळणी आणि मुस्लिम लोकसंख्येवर भाष्य केले. या व्यतिरिक्त कंगनाने लोकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

कंगनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना बोलते की, “काल रात्री मी आणि माझ्या कुटुंबाने ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. सगळ्यात आधी विवेक अग्रीहोत्री आणि त्यांच्या टीमला कंगना धन्य आहात असे बोलते. या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून तुम्ही या देशाला जे दिलं आहे. संपूर्ण देशात आम्हाला अभिमान वाटेल असं काम तुम्ही केलं आहे. चित्रपटसृष्टी सदैव तुमची आभारी असेल. आपण अनेक दशकांपासून केलेली आमची सर्व पापं देखील धुऊन टाकली आहेत. मी सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानते.”

हेही वाचा :  Gangubai Kathaiwadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?

पुढे कंगना मुस्लिम लोकांच्या लोकसंख्येवर म्हणाली, “काश्मीरमधील या घटनेला एक दिवसाची घटना समजनं ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हा देश तयार झाला. तेव्हा इथे जेवढे हिंदू होते तेवढेच मुस्लिम होते. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या बघा आणि आता नावालाही हिंदू नाहीत. रोज त्यांना मारून फेकलं जातं, रोज त्यांच्या विनयभंग होतो. कुठे गेले कोटींच्या संख्येने असलेले ते लोक?”

आणखी वाचा : किरण रावमुळे पहिल्या पत्नीसोबत लग्न मोडलं का? आमिर खानने दिलं उत्तर

पुढे कंगनाने, बांग्लादेशमध्ये गेल्या वर्षी झालेल्या घटनेवर वक्तव्यं केलं आहे. “ही सरकारची लढाई नाही, ती सभ्यतेची लढाई आहे. प्रत्येक भारतीयाची एक लढाई असते. आपल्याला कोणी काही सांगणार नाही. आपल्यात असलेली माणूसकी आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देईल. यानंतर कंगनाने लोकांना हात जोडून विनंती केली की, जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा आणि एकत्र नव्या भारताला बनवूया.”

हेही वाचा :  थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना सावधान! पार्टी बेतू शकते तुमच्या जीवावर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही …