तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, भारताला विजयासाठी 100 धावांची गरज

IND vs BAN 2nd Test Day 3 Stumps: शेरे बांगला स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामनाच्या तिसऱ्या दिवसाखेर भारतानं चार विकेट गमावून 45 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 100 धावांची गरज आहे. बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, शाकीब अल हसनला एक विकेट मिळाली. 

बांगलादेशचा दुसरा डाव
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ 80 धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर दिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात भारतानं बांगलादेशच्या संघाला 231 धावांवर रोखलं. लिटन दास आणि झाकीर हसन यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दोलायमान होत असलेल्या या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत भारताला मजबूत स्थितीत नेले. हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 145 धावांची लक्ष्य मिळालं आहे.

बांगलादेशचा पहिला डाव 
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या. 

हेही वाचा :  IPL 2022 : कर्णधार आणि माजी कर्णधार करतील आरसीबीकडून ओपनिंग, अशी असेल बंगळुरुची अंतिम 11

भारताचा पहिला डाव
भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात तशी खास झाली नाही. सलामीवीर केएल राहुल 10 तर शुभमन गिल 20 धावा करुन तंबूत परतले. कोहली आणि पुजारा कमाल करतील असे वाटत होते पण दोघेही प्रत्येकी 24 धावा करुन बाद झाले. ज्यानंतर मात्र ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं डाव सावरला. दोघांनी दमदार अशी फलंदाजी सुरु ठेवली. पंतने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. दोघांनी 150 हून अधिक धावांची भागिदारी केली. पण शतकापासून दोघेही थोडक्यात हुकले. पंत 105 चेंडूत 93 धावा करुन बाद झाला तर श्रेयस अय्यर 105 चेंडूत 87 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले आणि 314 धावांवर भारताचा डाव आटोपला. बांगलादेशकडून तायजून इस्लाम आणि कर्णधार शाकिबने प्रत्येकी 4 तर तास्किन अहमद आणि मेहदी हसननं प्रत्येकी एक विकेट घेतली.

News Reels

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …