मुंबई, पुण्यातून पाऊस गायब, उकाडा सुरु; पावसाची काय स्थिती? हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Monsoon Update: जून महिन्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काही दिवसांतच सगळी कसर भरुन काढली आहे. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने सध्या मात्र विश्रांती घेतली आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या कोकणातही पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई, पुण्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मात्र इतर 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

यलो अलर्ट म्हणजे संबंधित जिल्हा किंवा शहरात नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबला असून, पुन्हा एकदा कडक ऊन पडत आहे. यामुळे मुंबईकरांना आता छत्री बाजूला करुन उकाडा दूर करण्यासाठी हवा खावी लागत आहे. दरम्यान, हेच वातावरण पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. येथे हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा :  Rain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू

पावसाचा जोर कुठे कमी होईल?

मुंबई, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 

दरम्यान, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत उकाडा वाढला असून पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे. पण ही तापमानवाढ जास्त नसेल. राज्यात पुढील काही दिवस संमिश्र स्थिती असू शकते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …