रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावले ; पण जिद्दीने IAS पद कमावले!

UPSC IAS Success Story आपण कोणतेही संकट आले तरी घाबरून जातो पण त्यावर मात करत यश गमवायला धमक लागते.आपल्या अडचणींपुढे हात टेकणाऱ्या अनेकांसमोर सूरज तिवारीने एक उदाहरण ठेवलं आहे. कितीही समस्या आल्या तरी प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं हे त्याने दाखवून दिलं आहे. त्यांनी मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर युपीएससीच्या परीक्षेत ९१७ क्रमांक पटकावला आणि आय.ए.एस अधिकारी झाला.

त्याचे वडील शिलाईचा छोटेखानी व्यवसाय करतात. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सूरजने कष्टाची जाणीव ठेवली. त्याचे शालेय शिक्षण हे महर्षी परशुराम शाळेत झाले.तर त्याने मैनपुरी मधून दहावी – बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. पण२४ जानेवारी २०१७ रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती.

यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर २०१८ मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बी.एमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून २०२१ साली बी. ए पास करून एम.एला प्रवेश घेतला.या सोबत युपीएससीचा देखील अभ्यास चालू ठेवला. त्याने मेहनत करत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश संपादित केले आहे. अखेर, तो‌ आय.ए.एस अधिकारी झाला.

हेही वाचा :  NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 388 पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

मित्रांनो, तुम्ही देखील कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नका. प्रयत्न करत रहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …