Christmas 2023 : येशू ख्रिस्तांची समाधी जेरुसलेममध्ये की भारतात? काश्मीरशी काय आहे संबंध?

Christmas Special 2023 : Why ‘DA VINCI CODE’ या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली खरी, पण जगभरात हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात येशू ख्रिस्त यांनी लग्न केले आणि त्यांना मुलंही झाली होती त्यानंतर ते भारतात आले होते, असं दाखविण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अनेक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘येशू नावाचा एक बौद्ध भिक्षू होता. या डॉक्युमेंटरीमध्ये येशूला सुळावर चढवण्याची कल्पना नाकारण्यात आली आहे. शिवाय जेव्हा येशू 30 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या आवडत्या ठिकाणी आले होते, असा दावा करण्यात आला आहे.  (Tomb of Jesus Christ in Jerusalem or in India What is the relationship with Kashmir mystery of isa masih life Christmas Special)

जर्मन विद्वान होल्गर कर्स्टन यांनी येशूंच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल लिहिताना असा दावा केला आहे की, येशू सिंध प्रांतात आर्यांसोबत स्थायिक झाले होते. यावरुन असा प्रश्न उपस्थित होतो की, मग येशू ख्रिस्त कधी भारतात आले होते का?

हा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे आणि अनेक ख्रिश्चन मिशनरी संस्था, ज्यात एव्हिडन्स फॉर ख्रिश्चनिटी (evidenceforchristianity.org) आहेय त्यांनी ही शक्यता पूर्णपणे नाकारल्याचं वारंवार दिसून आलं आहे. ओशो सारख्या तत्वज्ञानी, निकोलस नोटोविच आणि लेव्ही एच डॉलिंग सारख्या विद्वानांच्या दावाचं काय असा प्रश्न उपस्थित होतो. या दाव्यावर तुम्ही विश्वास ठेवावा असा आमचा हेतू नाही. मात्र या निमित्ताने कोण कुठला दावा केला आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा :  Congress | दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला?

मठातील बुद्धी, जेरुसलेममधील मशीहा

लोकांना येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनाबद्दल फारशी माहिती आजही कोणालाही नाही. त्यांच्या आयुष्यातील 18 वर्षांची माहिती ‘न्यू टेस्टामेंट’ यामध्येही नाही मिळतं. त्या निनावी वर्षांना हरवलेली वर्षे किंवा मूक वर्षे असं म्हटलं जातं. 
1887 मध्ये निकोलस नोटोविच या रशियन विद्वान आणि युद्ध पत्रकाराने येशू ख्रिस्ताविषयी वेगळा सिद्धांत जगासमोर मांडला. स्पीकिंग ट्रीच्या अहवालानुसार, लडाखमधील हेमिस मठात ठेवलेल्या ‘लाइफ ऑफ सेंट जीझस, बेस्ट ऑफ द सन्स ऑफ मेन’ या दस्तऐवजाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक सिद्धांत 1894 मध्ये फ्रेंच भाषेत प्रसिद्ध केला आहे. लेहमधील एका मठात वेळ घालवत असताना तिथल्या लामांनी त्याला येशूबद्दल सांगितलं होतं, असा त्यांचा दावा आहे. 

त्यांच्या दाव्यानुसार, येशू एक महान देवदूत होते आणि सर्व दलाई लामांमध्ये महान होते. इस्रायलमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या येशूने वयाच्या 13 ते 29 व्या वर्षी एका मठात ज्ञान प्राप्त केल्यानंतर जेरुसलेमला आले होते. तिथे ते इस्रायलचा मसिहा बनले होते. लामा यांनी दावा केला की, येशू ख्रिस्ताने भारतात येऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि देशातील अनेक शहरांमध्ये दीक्षाही दिल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मणांचा राग आल्यानंतर तो हिमालयात निघून गेले होते, दावा लामा यांनी केला आहे.  

हेही वाचा :  वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग ; कोह सामुई येथील निवासस्थानाच्या तपासणीनंतर थायलंड पोलिसांची माहिती

jesuschristtomb

भारत, तिबेट, इराणचा दौरा!

अमेरिकेतील धर्मोपदेशक लेव्ही एच. डोलिंग यांनी1908 मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. ‘अ‍ॅक्वेरियन गॉस्पेल ऑफ जिझस द क्राइस्ट’ या पुस्तकात येशूच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे आणि इतर सर्व माहिती त्यांना अलौकिक शक्तींद्वारे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं की, तरुण असताना येशूने भारत, तिबेट, ग्रीस, इराण आणि इजिप्तचा दौरा केला होता. 

ऋषिकेश हरिद्वारमधील येशू गुहा ही ऋषिकेशच्या उत्तरेकडील असून जिथे येशू काही काळ वास्तव्य केला होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या शतकात या गुहात स्वामी रामतीर्थ आणि स्वामी रामदास दोघेही तेथे वेगळ्या वेळी राहिले होते. 1148 मध्ये लिहिलेल्या राजतरंगिणी नावाचा आणखी एक काश्मिरी इतिहासात असा दावा करण्यात आला आहे की, येशू नावाचा एक महान संत दल सरोवराच्या काठी इसाबार इथे राहत होता. 

येशूचं काश्मीर कनेक्शन!

काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एक समाधी (jesus christ tomb) बांधलेली आहे, असा दावा स्थानिक लोकांनी केला आहे. मात्र, अधिकृतपणे ही समाधी मध्ययुगीन मुस्लिम धर्मोपदेशक युजा असफ यांची कबर असही काही तज्ज्ञ सांगतात. काही लोक असा दावा करतात की, येशू ख्रिस्ताने वधस्तंभातून सुटल्यानंतर आपले उर्वरित दिवस काश्मीरमध्ये व्यतित केले आहेत. या श्रद्धेमुळे श्रीनगरमध्ये त्यांची समाधी बांधण्यात आल्याचं बोलं जातं. हे स्थान परदेशी प्रवाशांसाठी महत्त्वाचं स्थान मानलं जातं. काश्मीर मधील जुन्या शहरातील या जागेतील एका इमारतीला रुजाबाल (Roza Bal, Rouza Bal, or Rozabal) म्हणून ओळखली जातं. 

हेही वाचा :  “राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाईंची चेष्टा केली त्याच्याविषयी विरोधी पक्षनेत्यांनी…”; राऊतांची टीका

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, स्थानिक लोकांनी पुष्टी केली की येशूने काश्मीर खोऱ्यात बरीच वर्षे व्यतित केली आहे. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत ते इथेच राहत होते, असं त्यांचा विश्वास आहे. यानुसार, जर येशूने किशोरावस्थेतील 16 वर्षे आणि आयुष्यातील शेवटची 45 वर्षे येथे घालवली असती, तर ते सुमारे 61 वर्षे भारत, तिबेट आणि आसपासच्या भागात राहिलचा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. 

काय म्हणाले ओशो?

भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांनीही येशू ख्रिस्त भारताशी संबंधित असल्याचं म्हटलंय. ओशो म्हणाले, ‘जेव्हा कोणी सत्यासाठी तहानलेला असतो, तेव्हा तो उत्स्फूर्तपणे भारताबद्दल उत्सुक होतो आणि पूर्वेकडे प्रवासाला निघतो. ही केवळ आजची गोष्ट नाही. अडीच हजार वर्षांपूर्वी पायथागोरसही सत्याच्या शोधात भारतात आले होते. अगदी येशू ख्रिस्तदेखील.

बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या 13 ते 30 वर्षांच्या जीवनाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यात त्यांना वयाच्या 33 व्या वर्षी वधस्तंभावर खिळले होतं. 17 वर्षांचा लेखाजोखा बायबलमधून जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचं ओशो यांचा दावा आहे. जेव्हा येशू भारतात आले तेव्हा बुद्ध निघून गेले होते पण बौद्ध धर्म खूप जिवंत होता. ते म्हणतात की, येशू यांच्या मृत्यूही भारतात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे ख्रिश्चन विद्वानांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून येशू आणि बौद्ध धर्म यांच्यातील संबंधाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा आजही सापडलेला नाही. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …