‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवट आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाने? | aai kuthe kay karte will end by this way arundhati and aashutosh marriage know more


‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या ही मालिका वेगळ्या वळणारवर आहे. अरुंधती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. आता लवकरच तिचा अल्बम देखील लॉन्च होणार आहे. अरुंधतीचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. या सगळ्यात आशुतोषने संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता या सगळ्यानंतर पुढे काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आशुतोषने सगळ्यांसमोर अरुंधतीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला. त्यावेळी तिथे आई, संजना, अनिरुद्ध, अनघा, अविनाश आणि अभिषेक उपस्थित होते. तर ज्या व्यक्तीला अरुंधती मित्र मानते अशा व्यक्तीच्या मनात तिच्यासाठी प्रेम भावना आहेत हे कळल्यानंतर तिला देखील धक्का बसतो. आशुतोश अरुंधतीला भेटून सांगतो, “मी तुला विसरू शकेल असे मला वाटतं होते. पण माझ्या मनात तू जशी होतीस तशीच आजही आहेस. यासोबतच त्याला अरुंधतीकडून कोणत्याही अपेक्षा नाही असे देखील सांगतो. तर ती जो निर्णय घेईल तो त्याला मान्य असेल असं आशुतोष अरुंधतीला सांगतो.”

हेही वाचा :  जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

अरुंधती आशुतोष बोलते की “तिने आजवर फक्त अनिरुद्धवर प्रेम केलं आहे. मात्र, असं जरी असलं तरी सुद्धा मी तुझ्यसोबत एक मैत्रिण म्हणून राहीन. तुझ्यासोबत काम करण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही असं अरुंधती आशुतोषला सांगते. यावर आशुतोष तिला सांगतो, जगात अनेक लोकांना आपली मैत्री खटकणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनात स्पष्टता आहे. तोपर्यंत आपण यातल्या कोणत्याच गोष्टीची पर्वा करण्याची गरज नाही.”

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?

पुढे जेव्हा आप्पांना हे सगळं कळतं तेव्हा ते कांचनला बोलतात, “मी असतो तर त्याला म्हणालो असतो. मी माझ्या मुलीला समजावतो. तू तिच्याशी लग्न कर. आप्पांचे हे बोल ऐकल्यानंतर कांचनला मात्र मोठा धक्का बसतो. आता आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाने मालिकेचा शेवट होणार का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.”

हेही वाचा :  धुमधडाक्यात लग्न केलं, मात्र नात्यात मिळाला मोठा धोका! आजही एकट्याच राहतात ‘या’ अभिनेत्री



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …