राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला. 

आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा देत आगामी काळात मनसे जोरदार लढेल, याची खात्री देतो अशी गर्जना राज ठाकरे यांनी यावेळी केली. 

राज्यापालांचा घेतला समाचार
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. 
आमच्या राज्यपालांना समज बिमज काही आहे का, त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो, असं सांगत राज ठाकरे यांनी राज्यपालांची नक्कल करुन दाखवली. मी त्यांना शेकहँड केलं त्यानंतर मला असं वाटलं की ते आता माझा हात बघून भविष्य सांगतील. कुडमुडे ज्योतिष असतात तसं.

आपला अभ्यास नसताना फक्त बोलायचं, कुठल्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींचे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची. त्यातून बोध घ्यायचा नाही.  आमच्याच महापुरुषांना बदना करायचं आणि तुमची माथी फिरवून मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरु आहे सध्या. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची लहानपणी लग्न झाल्याचं राज्यपालांनी कुठल्यातरी भाषणात सांगितलं, तेव्हा लहानपणी लग्न व्हायची, पण तुमचं अजून नाही झालं. नको तिथे बोटं घालायची यांना सवय लागली आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी राज्यपालांची खिल्ली उडवली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …