‘सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी…’, सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Pune Hinjewadi Latest News : आयटी हब म्हणून उभं असलेल्या हिंडवजीच्या आयटी पार्कवर (Hinjewadi IT Park)  आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. दररोजच्या ट्रॅफिक जामला (Trafic jam) कंटाळून जवळपास 37 कंपन्या स्थलांतरीत झाल्या आहेत. तर आणखी काही कंपन्या राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. झी 24 तासने जेव्हा उद्योगमंत्र्यांचं लक्ष झी 24 तासनं वेधलं, तेव्हा माहिती घेतो, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय. त्यामुळे आता रोजगाराच्या मुद्द्यावर सरकार कोणतं पाऊल उचलतंय? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अशातच आता झी 24 तासच्या बातमीची सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दखल घेतली अन् सरकारवर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाल्या Supriya Sule ?

महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापुर्वीही महत्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी झी 24 तासने पाठपुरावा केलेल्या हिंजवडीच्या बातमीवर सरकारचं लक्ष वेधलं.

आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे. एक उद्योग बाहेर जातो तेव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भविष्य देखील संकटात येतात. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

 

हेही वाचा :  Maharashtra Political Crisis: "कोणी शुद्ध बुद्धीची व्यक्ती..."; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

दरम्यान, हिंजवडीतील 37 कंपन्या राज्याबाहेर चालल्याच्या झी २४ तासच्या बातमीची उद्धव ठाकरे गटाकडून दखल घेण्यात आली आहे. उद्योग राज्याबाहेर चाललेत, सरकार स्वस्थ बसलंय,  हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar: राज्य सरकारनं क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलंय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप …

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, ‘महिनाभरात भाजपाचे किती लोक…’

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान …