Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!

बर्‍याच लोकांना असे वाटते की घट्ट रक्त हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे परंतु हा केवळ एक गैरसमज आहे. खरं तर घट्ट रक्त आरोग्यासाठी हानिकारक असतं. रक्त घट्ट झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यासारख्या अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. वैद्यकीय भाषेत रक्त घट्ट होण्याला हायपरकोएग्युलेबिलिटी (Hypercoagulability असे म्हणतात. खरं तर या स्थितीमध्ये रक्तामध्ये लहान लहान गुठळ्या तयार होतात पण जेव्हा रक्त घट्ट होऊ लागते तेव्हा गुठळ्या मोठ्या होऊ लागतात. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. हे मेंदू, हृदय आणि फुफ्फुस यासारख्या अवयवांमधील रक्तप्रवाह रोखू शकते.

रक्त घट्ट होण्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका, हार्ट स्ट्रोक, थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो. खरं तर, जेव्हा रक्त घट्ट असते तेव्हा ते संपूर्ण शरीरातील ऑक्सिजन, हार्मोन्स आणि पोषक तत्वांच्या गतीमध्ये अडथळा आणू शकते ज्यामुळे रक्त ऊती आणि पेशींपर्यंत पोहचू शकत नाही. यामुळे पेशींमधील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते आणि हार्मोनल आणि पौष्टिक कमतरता होऊ शकते. रक्त घट्ट झाल्यावर शरीर कोणते संकेत देऊ लागते आणि कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने रक्त पातळ होण्यास मदत होऊ शकते हे जाणून घेऊया. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा

रक्त घट्ट झाल्याची लक्षणे

अनेकदा रक्त घट्ट होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर बहुतेक लोकांना समजते की त्यांचे रक्त घट्ट झाले आहे. कधी कधी रक्त घट्ट झाल्यावर देखील अनेक लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमध्ये छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जसे की हाताला मुंग्या येणे किंवा पाठ किंवा जबड्यात वेदना होणे, डोकेदुखी, अस्पष्ट बोलणे किंवा बोलण्यात अडचण येणे, चक्कर येणे, बोलणे समजण्यास त्रास होणे, पायाच्या खालच्या भागात वेदना होणे किंवा लालसरपणा येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)

आले

आल्यामध्ये सॅलिसिलेट आणि अॅंटी-इनफ्लेमेट्री गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्त घट्ट होण्यापासून प्रतिबंध होतो. ऍसिटिस्लासिलिक ऍसिड जे औषध तयार करण्यासाठी वापरले जाते ते सॅलिसिलेट्सपासून प्राप्त होते. हे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करू शकते.

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

दालचिनी

सुगंधी दालचिनी अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी एक शक्तिशाली रक्त पातळ करणारा मसाला आहे. या मसाल्यामध्ये कौमरिन Coumarin असते, ज्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात आणि त्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी (blood pressure) आणि संधिवातामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी देखील दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो.

हेही वाचा :  Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, 'या' लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!

(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)

हळद

हळदीला गोल्डन स्पाइस म्हणतात. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. हळदीच्या मुख्य सक्रिय घटकांपैकी एक असलेल्या कर्क्यूमिनमध्ये रक्ताच्या गुठळ्या काढून टाकण्याची क्षमता असते आणि हे तत्व रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखू शकते. याशिवाय हळद ही अॅंटीइनफ्लेमेट्री आणि अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

लाल मिरची

लाल मिरचीमध्ये सॅलिसिलेट्सचे प्रमाण जास्त असल्याने ती रक्त पातळ करण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. लाल मिरचीचा वापर ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या जेवणात वाटलेल्या लाल मिरचीचा वापर करू शकता किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील खाऊ शकता.

(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)

लसूण

अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे लसूण सुपरफूड म्हणून ओळखली जाते. हे विविध प्रकारचे औषध तयार करण्यासाठी वापरले जाते. संशोधन असे सूचित करते की लसूण पावडरमध्ये अँटी-थ्रॉम्बोटिक गुणधर्म असतात ज्यामुळे रक्त गोठण्याची समस्या कमी होते.

हेही वाचा :  Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात 'हा' पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!

(वाचा :- Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …