YCMOU Exam: विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून न देता परीक्षेचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध करून न देता परीक्षेचे नियोजन करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अखेर एमए अर्थशास्त्र अभ्यासक्रमाची परीक्षाच स्थगित करावी लागली आहे. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, ही परीक्षा कधी घेतली जाणार, याबद्दलही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे कोणतीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते. प्रत्येक सत्रासाठी हा पुस्तकांचा सेट विद्यापीठामार्फत दिला जातो. परंतु, यंदा एमए अर्थशास्त्र अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना सहापैकी तब्बल पाच पुस्तके विद्यापीठाने दिलेली नसून, केवळ एकच पुस्तक या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

असे असतानाही विद्यापीठामार्फत २४ जानेवारीपासून परीक्षांची घोषणा करण्यात आली होती. परंतु, या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकेच उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठाला एमए अर्थशास्त्र विषयाची परीक्षा स्थगित करावी लागली आहे. ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाईल, याबाबत विद्यापीठाकडे नियोजन नाही. संबंधित विद्यार्थ्यांना पुस्तके कधी उपलब्ध करून दिली जातील याचीही स्पष्टता विद्यापीठाकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा :  RTE प्रवेशासाठी चुरस; एक लाख जागांसाठी तीन लाख अर्ज!

शिक्षणक्रमाची, तसेच पुस्तकांची फी भरूनही केवळ विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अर्थशास्त्रच नव्हे, तर लोक प्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांनाही पुस्तकांचा पूर्ण सेट उपलब्ध झालेला नाही. परंतु, विद्यापीठामार्फत त्यांच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मराठवाडा विद्यापीठात बायोमेट्रिक सुरु; विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना नोंदवता येणार उपस्थिती
गेल्या काही वर्षांत मुक्त विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या घटत असून, विद्यार्थी मिळविण्यासाठी विद्यापीठामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, त्याचवेळी अनागोंदी कारभारामुळे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे मात्र विद्यापीठाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. विद्यापीठातील अंतर्गत कुरघोड्या आणि राजकारणच याला कारणीभूत असल्याची चर्चाही शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

जबाबदारी कोण घेणार?

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला असता संबंधित विषयाची परीक्षा स्थगित केली असून, त्याची कारणे सांगता येणार नसल्याचे परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी सांगितले. तसेच याबाबत संबंधित विभागाचे संचालक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनाही याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हेही वाचा :  नव्या शैक्षणिक धोरणाचे धडे शिक्षक गिरवणार

वर्षभरात विद्यार्थ्यांना केवळ विलंबाचाच फटका, उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …