आधारकार्डमधील चुका सुधारण्याचे काम शिक्षकांवर, विद्यार्थ्यांना शिकवणार कधी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमधील संचमान्यता करण्यासाठी बंधनकारक असलेली विद्यार्थ्यांच्या ‘आधारकार्ड’ची नोंदणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरत आहे. ‘आधार’ नोंदणीच्या वेळी झालेल्या चुकांमुळे आता विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकल्याने ‘महा ई-सेवा’ केंद्रांवर शिक्षकांना सातत्याने जावे लागत आहे. शाळेत शिकवायचे की, ‘आधार’ नोंदणी करायची, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.

जबाबदारी नक्की कोणाची?

राज्य सरकारकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केली जाणारी संचमान्यता ‘आधार नोंदणी’च्या आधारे होणार आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये अजूनही १९ लाख विद्यार्थ्यांनी ‘आधार’ काढलेले नाही. ज्यांनी काढलेले आहे त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, अशा चुका आहेत. या चुका सुधारून ‘आधार’ अपडेट करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकली आहे. मुळात ही जबाबदारी पालकांची असताना शाळांवर त्याचा भार का, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहेत.

शिक्षकांचा वेळ वाया

काही शिक्षकांच्या मते, ‘महा ई-सेवा’ केंद्रांवर आधार अपडेट करण्यासाठी संपूर्ण दिवस द्यावा लागतो. पालक त्यांच्या व्यस्ततेमुळे संपूर्ण दिवस थांबत नाहीत. यामुळे शाळेला नाइलाजाने हे काम करवून घ्यावे लागत आहे. त्यासाठी शिक्षकांचा वेळ जात असून, त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. काही शिक्षकांच्या मते नोंदणीची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण न करता टप्प्याटप्प्याने होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या संपूर्ण राज्यात ‘आधार’ नोंदणीचा घोळ सुरू असून, शिक्षणाऐवजी ‘आधार’ची कामे करण्यात शिक्षकांचा वेळ वाया जात असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा :  PET Exam: क्लिष्ट प्रश्नांमुळे 'पेट'ने फोडला घाम

अरेरे! महापालिकेच्या निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ

असा आहे गोंधळ…

– संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करताना शाळांना जी प्रक्रिया करावी लागते त्यात अनेक अडथळे आहेत, असे शिक्षकांचे सांगणे आहे.

– सरकारने ‘आधार नॉट जनरेटेड’, ‘आधार नॉट इश्युड’, ‘आधार नॉट सबमिटेड’ आणि ‘आधार मिसमॅच्ड’, अशा चार कलमांखाली माहिती भरायला सांगितली आहे.

– माहिती भरल्यानंतरही अनेकदा सरकारी यंत्रणा काम करीत नाही आणि माहिती भरूनही त्याचे ‘स्टेटस’ पूर्वीचेच दाखवत असल्याच्या तक्रारी शाळांकडून केली जात आहे.

विद्यार्थी पटसंख्या विचारात घेताना विद्यार्थ्यांच्या ‘पोर्टल’वर नोंदवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार व्हावा. ‘आधार’बाबत नोंदी अपूर्ण झाली यात विद्यार्थी आणि शाळेचाही दोष नाही. म्हणूनच ‘आधार’चा संदर्भ घेऊन पटसंख्या गृहित धरल्यास संचमान्यता करणे अन्यायकारक होईल. आधार असलेल्याच विद्यार्थ्यांना पोषण आहार, इतर सुविधांचा लाभ देणे हेदेखील अन्यायकारक ठरेल. टप्प्याटप्प्याने आधार नोंदणीची पूर्ण व्यवस्था करून मगच हा प्रकल्प राबवला जावा.
– महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

पोलीस भरतीची वेबसाइट बंद, उमेदवारांना अर्ज भरण्यात अडथळे

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …