पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार असून, पहिल्या टप्प्यात विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कार्निव्हल’ उपक्रमांतर्गत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात ‘चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम-समज आणि गैरसमज’ विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे अध्यक्षस्थानी होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सरसकट सर्व महाविद्यालयांमध्ये लागू होईल आणि इतर पदवी अभ्यासक्रम बंद होतील, हा गैरसमज असल्याचे नमूद करून डॉ. करमळकर म्हणाले, ‘हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी त्या पद्धतीच्या सोयीसुविधा विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आवश्यक आहेत. त्यामुळे सुरुवातीला विद्यापीठांचे शैक्षणिक विभाग आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम लागू होईल. या अभ्यासक्रमाच्या शिक्षणातून विद्यार्थी रोजगाराभिमुख होण्यासाठी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.’

हेही वाचा :  ICAI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

‘या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य शाखेव्यतिरिक्त आवडत्या इतर विषयांचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे. अंतिम वर्षात इंटर्नशिप राहणार असल्याने, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना रोजगारासाठी होणार आहे. त्याचप्रमाणे संशोधन करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी सकारात्मकतेने घेण्याची गरज आहे,’ असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

श्रीधर लोणी यांनी प्रास्ताविक केले. मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंझारराव यांनी आभार मानले. वैजयंती जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

‘विद्यार्थ्यांना अनेक संधी’

डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ‘चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू झाला, तरी पारंपरिक अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. नवा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घालणारा आहे. अभ्यासक्रमामुळे पदवी शिक्षणात ‘इक्विव्हॅलन्स’ येणार असून, एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेणे शक्य होईल. या अभ्यासक्रमाच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. त्यामुळे अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे.’

ठळक मुद्दे…

– शिक्षणातील टप्प्याप्रमाणे क्रेडिट्स (श्रेयांक) मिळतील.

– पहिल्या वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल. काही कारणास्तव शिक्षण सोडावे लागल्यास, पुन्हा काही दिवसांनी थेट दुसऱ्या वर्षी प्रवेश घेता येईल.

हेही वाचा :  रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

– दोन वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा मिळेल, तर तिसरे वर्ष यशस्वी पूर्ण केल्यानंतर पदवी मिळेल.

– संपूर्ण शिक्षण सात वर्षांत करणे अनिवार्य

– कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असल्याने नोकरीच्या संधी.

– अंतिम वर्षात संशोधन केल्यास, ऑनर्स किंवा रीसर्च पदवी मिळेल. त्यानंतर एका वर्षात पदव्युत्तर पदवी घेता येईल.

– विविध विद्यापीठांच्या पदवी शिक्षणात समानता येईल. परदेशात थेट मास्टर्स अभ्यासक्रमाला प्रवेश.

– सर्व महाविद्यालयांना आगामी काळात बहुशाखीय व्हावे लागेल.

मराठवाडा विद्यापीठाचा निर्धार; प्रवेश, निकाल वेळेत लागण्यासाठी काम सुरू

राज्यातील पदवी संस्थांची केंद्र सरकारकडून निवड

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …