शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते माहित आहे का? जाणून घ्या कोणता मार्ग आहे योग्य


हिंदू धर्मात सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी महादेवाची विधीनुसार पूजा आणि उपवास केले जातात. सोमवारच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त शिवलिंगावर त्यांचे प्रिय बेलाचे पान वाहतात. असे मानले जाते की भगवान शंकराला बेलची पाने अर्पण केल्याने त्याला शीतलता मिळते. महादेवाच्या आवडत्या बेल पत्राला संस्कृतमध्ये बिल्व पत्र देखील म्हणतात.

असे म्हटले जाते की पूजा करताना शिवलिंगावर बेल अर्पण केल्याने महादेव अधिक प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. तुम्हाला माहित आहे का महादेवाला बेलाचे पान का वाहिले जाते आणि महादेवाला बेलाचे पान अर्पण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घावी? आज आपण यासंबंधी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

बेलपत्र तोडण्याचे नियम

  • असे मानले जाते की चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथी तसेच संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र खंडित करू नये. तोडलेले पत्र या तारखांच्या आधी अर्पण करावे.
  • असे मानले जाते की बेलची पाने भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहेत, त्यामुळे या तारखांच्या आधी तुटलेली बेलची पाने अर्पण करणे शुभ मानले जाते.
  • स्कंद पुराणानुसार नवीन बेलपत्र उपलब्ध नसल्यास दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्रही अनेक वेळा धुवून वापरता येतात.
  • डहाळीतून फक्त बेलाची पानेच तोडावीत, संपूर्ण डहाळी कधीही तोडू नये.
  • असं म्हणतात की संध्याकाळी बेलच्या पानांना, तसेच कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये.
  • बेलाची पाने तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला नमस्कार करावा, असेही मानले जाते.
हेही वाचा :  Vijaya Ekadashi 2022: विजया एकादशीचं महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खोटं बोलण्यात पटाईत असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; कधीही देऊ शकतात धोका

शिवलिंगावर बेलची पाने अशाप्रकारे अर्पण करावी

  • असे म्हटले जाते, शिवलिंगावर बेलपत्र नेहमी उलटे अर्पण करावे. बेलपत्राचा गुळगुळीत भाग आतील बाजूस म्हणजेच शिवलिंगाच्या दिशेने असावा.
  • असे मानले जाते की शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करताना ते अनामिका आणि अंगठ्याने धरून अर्पण करावे. याशिवाय देवाला कोणतीही गोष्ट नेहमी सरळ हातानेच अर्पण करावी.
  • बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी एक दिवस आधी ते गंगेच्या पाण्यात टाकून ठेवावे.
  • लक्षात ठेवा शिवलिंगावर जी बेलची पाने अर्पण करायची आहेत, ती फाटलेली नसावी.
  • बेल पत्रामध्ये वज्र आणि चक्र नसावेत. अशी पाने खंडित मानली जातात.
  • कालिका पुराणानुसार शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र काढण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी वापरावी.
  • बेलपत्रामध्ये ३ ते ११ पाने असतात. असे मानले जाते, जितकी जास्त पाने असलेले बेलपत्र महादेवाला अर्पण कराल तितका जास्त लाभ तुम्हाला मिळू शकतो.

‘या’ व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही; मार्गात येतात अनेक अडथळे

  • असेही मानले जाते की बेलची पाने उपलब्ध नसल्यास केवळ बेलचे झाड पाहिल्यास पाप नष्ट होते.
  • लक्षात ठेवा की बेलपत्रामध्ये ३ पाने असावीत. ३ पाने एकच मानली जातात.
  • शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अनादर करू नये.
हेही वाचा :  Shani Vakri 2022: शनिदेव १४१ दिवस असतील वक्री, ‘या’ तीन राशींच्या संकटात होईल वाढ

येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.

The post शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते माहित आहे का? जाणून घ्या कोणता मार्ग आहे योग्य appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …