NEP: सात वर्षांत पदवी पूर्ण करण्याचे बंधन, यूजीसीकडून सुधारित श्रेयांक आराखडा आणि अभ्यासक्रम जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कालावधीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने तीन वर्षांच्या आधी अभ्यासक्रम सोडल्यास, त्याला तीन वर्षांत पुन्हा प्रवेश घेता येईल, तर सात वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी अभ्यासक्रमांचा सुधारित श्रेयांक आराखडा आणि अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला. सध्याच्या श्रेयांकांवर आधारित निवड पद्धतीत (चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) बदल करून नवी रचना करण्यात आली आहे. नवा चार वर्षांचा अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश ‘यूजीसी’ने उच्च शिक्षण संस्थांना परिपत्रकाद्वारे दिले.

नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. नव्या रचनेनुसार आता तीन वर्षांऐवजी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना सिंगल मेजर, डबल मेजर आणि बहुविद्याशाखांतून विषयांची निवड करता येईल. ऑनर्स आणि ऑनर्स संशोधन अशा दोन प्रकारांत ऑनर्स पदवी देण्यात येईल. चार वर्षांचा आणि १६० श्रेयांकांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ऑनर्स पदवी’ देण्यात येईल. ७५ टक्के गुण आणि श्रेयांक तीन वर्षांत मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी संशोधन शाखा निवडता येईल. विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध विद्यापीठातील, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावा लागेल.

हेही वाचा :  IIT Madras Online Course: बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी IIT मद्रासचा प्रिमिअर बँकर कोर्स

संशोधन प्रकल्प आणि प्रबंध हा प्रमुख विद्याशाखेतील असेल. १६० श्रेयांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे १२ श्रेयांक संशोधन प्रकल्प आणि प्रबंधासाठी असतील. संबंधित विद्यार्थ्यांना ‘संशोधनासह ऑनर्स पदवी’ देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागामध्ये मराठी कॉलेज प्रलंबितच

शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

असा राहणार पर्याय

नव्या रचनेत मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटचा पर्याय लागू असेल. विद्यार्थ्याने तीन वर्षांच्या आधी अभ्यासक्रम सोडल्यास पुढील तीन वर्षांत त्याला पुन्हा प्रवेश घेता येईल. सात वर्षांमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पहिल्या वर्षानंतर ४६ श्रेयांक प्राप्त करून अभ्यासक्रम सोडून बाहेर पडणाऱ्या, उन्हाळ्याच्या सुटीत चार श्रेयांकांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.

दोन वर्षे अभ्यासक्रमाचे ८० श्रेयांक पूर्ण करून, उन्हाळ्याच्या सुटीत चार श्रेयांकांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला पदविका दिली जाईल. संबंधित विद्यार्थ्याला तीन वर्षांत पुन्हा प्रवेश घेता येईल आणि अधिकाधिक सात वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. विद्यार्थी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम करीत असल्यास प्रमुख विषयांमध्ये श्रेयांक वितरण करण्यात येईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

हेही वाचा :  New Education Policy: आता ना सायन्स ना कॉमर्स; मग कसं असेल नवं शैक्षणिक धोरण?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …