माझी कहाणी : एका महिन्यात माझं १० किलो वजन वाढलं, नात्यातील नैराश्यामुळे माझ्या खाण्यावर माझे नियंत्रण नाही

प्रश्न: मी एक उत्साही तरुणी होते. पण फार काळ हे दिवस राहिले नाही नात्यातील नैराश्यामुळे माझे एक महीन्यात १० किलो वजन वाढले. माझ्या ब्रेकअपमुळे मी पूर्णपणे तुटले होते. त्यामुळे मला जेव्हापण दु:खी, राग किंवा निराश वाटतं, तेंव्हा मी खात होतं पण त्यावर माझे नियंत्रण राहिले नाही. मला कळत नाही आहे मी काय करु? मला असे आयुष्य जगायचे नाही. पण जेव्हापण मला टेन्शन येते मला भूक लागते पण आता माझे वजन वाढतच जात आहे. मी काय करू. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​​तज्ञांचे उत्तर

या समस्येवर डॉ स्वाती मित्तल यांनी सांगितले की तुमच्या आयुष्यातील या कठीण काळात तुम्ही प्रचंड एकटे आहेत. आव्हानात्मक भावनांचा सामना करताना लोक सांत्वनासाठी अन्नाकडे वळतात. काहीच सुचत नाही म्हणून ते अन्न खातात. पण या अन्नाची आपल्या शरीराला आवश्यकता नसते. पण आपण खात राहिलो तर आपल्याला बरे वाटेल अशी भावना निर्माण झाल्याने तुम्ही खात राहाता. पण या गोष्टीचा तुमच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम होत आहे या गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुम्ही काळजीत असाल, चिंताग्रस्त असाल, कंटाळा आला असाल, एकटे असाल, उदासीन असाल किंवा थकलेले असाल तेव्हा अन्न खावून तुम्हाला बरे वाटणार नाही ही गोष्ट समजून घ्या. (वाचा :- माझी कहाणी : माझा नवराच मुलाच्या जीवावर उठलाय, मला त्याची खूप भीती वाटते मी काय करु ?)

हेही वाचा :  खुर्चीत बसून करा हे आसान, जेवल्यानंतर 52% कमी होईल Blood Sugar

​नैराश्याचा सामना करा

नैराश्य, कामाचा ताण आणि नातेसंबंधातील समस्या या गोष्टी सर्वांच्या आयुष्यात असतात. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता तुमच्या नैराश्याची सामना करा. तुमच्या मानसिक आरोग्याचा परिणाम तुमच्या शरिरावर करु नका. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर त्याचा प्रभाव पडतो. या टप्प्यावर आपण मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

​व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

-12-

प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12, लोह किंवा थायरॉईड उत्तेजक संप्रेरकांची कमतरता असल्याने असा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीवर योग्यवेळी उपचार करा. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​फोनचा वापर कमी करा

या समस्येवर मात करण्यासाठी सर्व प्रथम, रात्री 8 नंतर तुमचा फोन न वापरण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चांगली पुस्तके वाचण्यात प्रोत्साहित करा. दुसरे म्हणजे, आत्म-प्रेम देखील तितकेच महत्वाचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुम्ही लोकांची मते ऐका. युटुबच्या मदतीने प्रेरणात्मक व्हिडीओ पाहा. (वाचा :- डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही, या काही कहाण्या थरकाप उडवतील)

हेही वाचा :  नात्यातील नैराश्य घालवण्यासाठी 5-5-5 चा नियम करेल मदत, फक्त हे सोप काम करा

​इतरांशी तुलना करु नका

स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळले पाहिजे. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी 6-7 तासांची झोप घ्या. योग्य वेळी योग्य जेवण घ्या. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांशी बोलता येईल यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होईल. (वाचा :- “आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …