अगदी तसंच माझ्या बाबतीत झालं. काही वर्षांनंतर जेव्हा मी माझं पहिलं प्रेम असलेल्या मुलाला समोर पाहिलं तेव्हा मला आम्ही एकत्र असतानाचा काळ आठवला. मात्र, मी त्याला एका लग्नात भेटले आणि हे लग्न इतर कोणाचे नसून त्याचे स्वतःचेच होते. (सर्व फोटो सांकेतिक आहेत आम्ही युजर्सनी शेअर केलेल्या कहाणीमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो) (फोटो सौजन्य :- iStock, pexels)
बहिणीचं लग्न ठरलं
खरं तर, एक दिवस माझ्या चुलत बहिणीने मला मेसेज केला, ज्यामध्ये तिने सांगितले की ती लवकरच लग्न करते आहे. तिचा तो मेसेज वाचून मला खूप आनंद झाला. कारण खूप दिवसांनी आमच्या कुटुंबात शुभकार्य पार पडणार होतं, ज्यामध्ये आम्ही खूप धमाल, मजा-मस्ती करायचं ठरवलं होतं. माझ्या बहिणीच्या लग्नात परफेक्ट दिसण्यासाठी मी सर्व तयारी सुरू केली. लेहेंगा, दागिन्यांची खरेदी केले. परफेक्ट दिसण्यासाठी मी डायटिंगही सुरू केली. हे सारं पाहून माझी आईही “तुझा मिस्टर राईट तुला कधी मिळणार गं..?” असं मला चिडवू लागली होती.
(वाचा :- जमिनीवर नको त्या अवस्थेत पडलेल्या पतीला बघून मी घाबरले व अॅम्ब्युलन्स बोलावली,नंतर जे सत्य समजलं ते हादरवणारं)
ऐन लग्नात मिळाली धक्कादायक बातमी
जसजसा वेळ निघून जात होता तसतशी बहिणीच्या लग्नाबाबतची माझी उत्सुकता वाढतच चालली होती. पण आता मला फक्त एकच खंत वाटते की, मी तिला एकदाही तिचा होणारा नवरा कोण आहे हे विचारले नाही. तिचे लग्न कोणासोबत निश्चित झाले हे मला माहीतच नव्हते. लग्नस्थळी पोहोचताच आमचे खूप जबरदस्त स्वागत करण्यात आले. मी माझ्या बहिणीला मिठी मारली आणि लग्नाबद्दल अभिनंदन केले. मी तिला आमचे होणारे जिजू कोण आहेत हे उत्सुकतेने विचारले. तेव्हा ती मला तिच्या होणा-या नव-याची ओळख करायला घेऊन गेली. नव-याला पाहून मला धक्काच बसला. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझे पहिले प्रेम होता.
(वाचा :- लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्योतिषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी)
आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला
माझ्या बहिणीने आनंदाने तिच्या भावी पतीशी माझी ओळख करून दिली. मला पाहून त्यालाही तितकाच धक्का बसला होता जितका की मला. त्याने मला विचारले कशी आहेस, मी मान हलवली आणि ठीक आहे म्हणाले. त्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मला हे नातं खोट्याच्या आधारावर सुरू करायचं नाहीये. त्यामुळे रूहीला आपल्या भूतकाळाबद्दल सर्व काही मला सांगायचं आहे. तू माझ्याबरोबर येशील का? मला हे सर्व खूप विचित्र वाटलं. कारण तो माझा बॉयफ्रेंड आहे हे माझ्या बहिणीला माहीत नव्हतं. भलेही आता आमचं एकमेकांशी काहीही नातं किंवा संबंध नव्हता पण त्यानंतरही आम्हाला बहिणीला सर्व काही खरं खरं सांगणं योग्य वाटलं.
(वाचा :- Rose Day: चुकूनही देऊ नका बायको व गर्लफ्रेंडला एकाच रंगाचं गुलाब, वाचा प्रत्येक रंगाचा अर्थ मग करा निवड नाहीतर)
अन् मग बहिणीने उचललं अनपेक्षित पाऊल
आम्ही दोघांनी बहिणीला आमच्या प्रेमाबद्दल आणि भुतकाळाबद्दल सगळं खरं खरं सांगितलं. ती म्हणाली की ही सर्व भूतकाळातील गोष्ट आहे त्यामुळे मला याच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही. खरं तर मी खूपच घाबरले होते पण रूहीने परिस्थिती छान हाताळली आणि मग मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण माझ्या हृदयात अजूनही खूप दुःख होते. कारण मी माझ्या पहिल्या प्रेमाला माझ्याच बहिणीवर प्रेम करताना अन् बायको म्हणून जगात मिरवताना पाहू शकत नव्हती. खरं तर मी दु:खी व्हायला नको होते कारण ब्रेकअप करण्याचा निर्णय आम्ही संगनमताने घेतला होता.
(वाचा :- लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..)
स्वत:ला कामात व्यस्त ठेवले
पुढचे काही दिवस दोघांनाही लग्नाच्या विधींमध्ये बघून माझ्या काळजावर घाव होत होते. आम्ही दोघंही क्वचितच बोलायचो. डोक्यात त्याच्याबद्दल जास्त विचार करू नये म्हणून मी स्वतःला व्यस्त ठेवले. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी मी त्याला एक गोष्ट सांगायची मनाची कठोर तयारी केली. मी त्याच्याकडे गेली आणि म्हणाले मला आनंद आहे की तुला तुझा जीवनसाथी मिळाला आहे. नेहमी आनंदी रहा. मला हे कधी सांगावे लागेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. खरंच पहिलं प्रेम खूप वेदना देतं. मात्र, हे सर्वांसोबतच घडेलच असे नाही. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर मीही माझ्या आयुष्यात मुव्ह ऑन केलं. मी सुद्धा आता एक स्टेबल रिलेशनशिपच्या शोधात आहे.
(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)
आयुष्यात पुन्हा एक्ससोबत भेट झाल्यास काय करावं?
- EX सोबत शारीरिक अंतर ठेऊनच वागा म्हणजेच मिठी मारणं, जवळ उभं राहणं टाळा आणि आपल्या जोडीदाराचा हात पकडून उभे राहा. यातून हे सिद्ध होतं की आता जोडीदारच आयुष्यात तुमच्यासाठी सारं काही आहे. सोबतच एकमेकांचा नंबर घेणं किंवा देणं टाळा. कारण जो भूतकाळ आहे त्याला पुन्हा आयुष्यात आणून नातं खराब होऊ शकतं. कारण यामुळे सांसारिक जीवनात अनेक गैरसमज होऊ शकतात.
- तसंच तुमची आणि भूतकाळातील प्रियकर/प्रेयसीची भेट भलेही खूप वर्षांनंतर होवो पण वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्याचा अजिबात प्रयत्न करु नका. कारण असं केल्याने जोडीदाराचा गैरसमज होऊ शकतो की अजूनही तुम्हाला त्याच्या आयुष्यात रुची आहे किंवा तुम्हाला अजूनही त्याची काळजी वाटते आहे. त्यात जर समोरच्या व्यक्तीला अजूनही तुम्ही आवडत असाल तर परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या वर्तमानावर होऊ शकतो.
- जर रस्त्यात अचानक तुमचा पहिला प्रियकर किंवा प्रेयसी समोर आली तर हात मिळवल्यानंतर सर्वात आधी आपल्यासोबत असणा-या आपल्या जोडीदाराची ओळख करुन देण्यास विसरु नका. या दरम्यान संवाद साधत स्थिती साधारण ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपलं आपल्या जोडीदारावर किती प्रेम आहे आणि आता तुम्ही या नात्यात किती प्रामाणिक आहात हे हालचालींवरुन EX ला दाखवायला विसरु नका. कारण यामुळे तुमच्या जोडीदारालाही हा विश्वास पटेल की समोर असलेला EX हा तुमच्यासाठी एका भूतकाळापेक्षा जास्त काहीच नाही.
(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)