कल्याण : ठेकेदारास १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक ; न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी


कामगारांना रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून मारहाण देखील करण्यात आली होती.

कल्याण पूर्व येथील रेल्वेच्या मालगाडी थांब्यावरील जमिनीला संरक्षक भिंत बांधण्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील ठेकेदाराकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय कदम आणि एस.जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मेसर्स एस. बी. खंकाळा कंपनीच्या माध्यमातून कल्याण पूर्वकडील रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम घेतलेल्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार ठाण्यातील नौपाडा भागात राहतो. रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम सुरु केल्यानंतर विजय कदम याने बांधकामाच्या ठिकाणी येऊन पैशांची मागणी केली. काम बंद होऊन नुकसान होऊ नये म्हणुन कंपनी व्यवस्थापकाने विजय कदम याला त्याच्या मागणीनुसार ५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर विजय हा व्यवस्थापकाला पुन्हा धमकावून पैशाची मागणी करत होता. ठेकेदाराने विजयला प्रतिसाद न दिल्याने विजय कदम व त्याच्यासोबत असलेले ३ व्यक्तींनी खंडणी वसूल करण्यासाठी कल्याणच्या रेल्वे यार्ड या साईटवर काम करत असलेल्या कामगारांना आनंदवाडीतल्या रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून मारहाण केली. याशिवाय १० दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास कामगारांचा जीव घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध घेऊन आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा :  गर्लफ्रेंडसोबत लैगिंक संबंधादरम्यान 67 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला Epileptic Attack म्हणजे काय?

कल्याण न्यायालयाने या दोघांना चौकशीकरिता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. डोके करत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …