काश ! हनिमूनच्या पहिल्या रात्री मला या गोष्टी माहित असत्या तर माझी आज ही अवस्था झाली नसती

लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज, प्रत्येक जोडप्याच्या मनात लग्नाच्या पहिल्या रात्रीचा उत्साह असतो. या दिवसापासून नव्या आयुष्याची सुरुवात होते. पण या काळात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. लग्नाच्या सुरवातीच्या काळात घडलेल्या घटना आयुष्याभर लक्षात राहतात. पण चित्रपटात दाखवल्या जातात तशा गोष्टी खऱ्या आयुष्यात होत नाही. या काळासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेच आहे. तुम्ही जसा विचार करता नेहमी तसेच होईल असे होत नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी एक महिलेने तिचे काही अनुभव शेअर केले आहेत तिच्या मते जर तिला काही गोष्टी आधी लक्षात आल्या असत्या तर आज त्यांचे आयुष्य खूप वेगळे असते. (फोटो सौजन्य : Pexels, i stock )

​आराम करणे

हिंदी चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे लग्नानंतरच्या पहिली रात्रीची संकल्पना खूपच वेगळी आहे. कारण लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत पोहोचता तेव्हा तुम्ही झोपेशिवाय कशाचाही विचार करू शकत नाही. कारण या काळात तुम्ही खूप थकलेले असता. त्यामुळे या रात्री आराम करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : istock) (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं

असुरक्षिततेची भावना जन्म घेते

लग्नाच्या दिवशी आपण किती सुंदर दिसत होता हे महत्त्वाचे नाही. पण जेव्हा खरा चेहरा समोर येतो तेव्हा मात्र संपूर्ण चित्र बदलून जाते. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमच्या पोटावर किंवा पाठीवर स्ट्रेच मार्क्स असतील आणि तुमचा पार्टनर त्यांना विचित्र प्रतिक्रिया देत असेल तर तुमच्या असुरक्षितेची भावना निर्माण होते. पण जर तुमच्या बाबतीत असं झाल तर तुम्ही तुमच्या शरीराचा अभिमान बाळगला पाहिजे. (फोटो सौजन्य : istock) (वाचा :- माझी कहाणी : नात्यात काहीच उरलं नाही पण समाजासाठी मी या माणसासोबत राहते, या नात्यात श्वास कोंडतोय मी काय करू?)

​झोप महत्त्वाची

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ घालवणं गरजेच आहे. पण शरीराला 8 ते 10 तासांच्या झोपेची आवश्यकता. विधी, लोकांने भेटणे यामध्ये नव वधू वर दमून जातो. (फोटो सौजन्य : i stock) (वाचा :- माझी कहाणी : बायकोला पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन् माझ्या पायाखालची जमीनच सरकली)

​एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्या

लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विचार केला की आपल्या मनात हिंदी चित्रपटातील दृश्ये येतात. पण सत्य हे आहे की या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खूप बोलतो. पण या काळात तुम्ही एकमेकांशी गप्पा मारु शकता. (वाचा :- माझी कहाणी : बायकोला परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन् माझ्या पायाखालची जमीनच सरकली)

हेही वाचा :  नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि...

​तंग कपडे घालण्याचा अट्टाहास नको

या महिलेने सांगितले की मी जेव्हा लग्न करणार होतो तेव्हा मला अनेकांनी सेक्सी नाईटी घालण्याचा सल्ला दिला होता. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की लग्नाच्या रात्री फक्त तेच परिधान करा जे आरामदायक आणि चांगले दिसले. आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण मादक कपड्यांच्या मागे राहू नका. (फोटो सौजन्य – pexels) (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​इअरप्लग येतील कामाला

अरेंज्ड मॅरेजमध्ये आपण आपल्या जोडीदाराला ओळखत नाही. अशा परिस्थितीत जर त्याला घोरण्याची सवय असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होई शकतो. अशा परिस्थितीत इअरप्लगची जोडी पर्समध्ये पॅक करणे चांगले. याचे कारण असे की काहीवेळा हे घोरणे इतके जोरात असू शकतात की झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला मायग्रेन देखील होऊ शकतो. (फोटो सौजन्य : iStock) (वाचा :- Anxiety Disorders : नात्यातील नैराश्य घालवण्यासाठी 5-5-5 चा नियम करेल मदत, फक्त हे सोप काम करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …