मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही

प्रश्न :- मी घटस्फोटित महिला आहे. 7 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये एका पुरुषाशी माझी भेट झाली. तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. एकत्र प्रवास करताना आम्ही आमचे नंबर शेअर केले होते, त्यानंतर आम्ही बोलू लागलो. मात्र, आम्ही कधीच रोज बोलायचो नाही, त्यामुळे आमच्यात लव्हमेकिंग सीन नव्हता. दरम्यान माझे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले होते, पण त्यानंतर माझ्या वैवाहिक जीवनात समस्या सुरू झाल्या, त्यानंतर मला घटस्फोट घेणे योग्य वाटले.

मला मी घेतलेला निर्णय आजही योग्य वाटतो कारण ज्या वव्यक्ती सोबत आपले अजिबात पटत नाही त्याच्यासोबत उगाच मन मारून राहणे याला अर्थ नाही. यानंतर माझे आयुष्य ढकलगाडी सारखे सुरू होतेच पण काही काळाने ते बदलले कारण माझ्यासमोर अजून एक पर्याय उभा राहिला. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

मला त्या व्यक्तीचा फोन आला

माझ्या घटस्फोटानंतर काही वर्षांनी, एके दिवशी अचानक मला ट्रेन मध्ये भेटलेल्या त्या माणसाचा फोन आला. आम्ही एकमेकांशी नॉर्मली बोलत असतानाच तो म्हणाला की त्याचे माझ्यावर प्रेम आहे. त्याने सांगितले की त्याला मनापसून असे वाटू लागले आहे. पण तो विवाहित असून त्याला एक मूल आहे. त्याने मला सांगितले की तो त्याच्या पत्नीवर कधीही प्रेम करू शकत नाही. कारण दोघांनी जबरदस्तीने लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनीच त्याला पत्नीपासून वेगळे व्हायचे होते पण आई-वडिलांनी तसे होऊ दिले नाही. काही महिन्यांनंतर पत्नी गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्यांनी संसार सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  मी एक चांगली आई तर झाली, पण मुलाला आयुष्यात कधीच वडिलांचं सुख देऊ शकणार नाही

(वाचा :- नवरा व सासूमध्ये रोज मरण माझं होतंय, नवरा प्रत्येक गोष्टीत रडगाणं गात बसतो आणि सासूची त-हा ऐकून तर व्हाल थक्कच)

मी काय करावे?

मात्र त्यानंतरही त्यांच्यात प्रेम निर्माण झाले नाही आणि आजही त्यांचे संबंध चांगले नाहीत. त्यांच्यात पती-पत्नीसारखे नाते अजिबातच नाही. त्याला फक्त या लग्नातून बाहेर पडायचे आहे पण त्याच्याकडे पत्नीला पोटगी देण्यासाठी पैसे नाहीत. एवढेच नाही तर त्याचे कुटुंबीय सुद्धा त्याला सपोर्ट करत नाहीत असेही त्याने मला सांगितले. कारण त्याची आई अंथरुणावर असताना त्याच्या पत्नीने तिची अजिबात काळजी घेतली नाही. त्यांना बाहेरून अण्णा ऑर्डर करून खावे लागायचे. त्याच्या आईची काळजी घेतली गेली नाही हे सुद्धा त्याच्या नाराजी मागचे एक कारण आहे. आता त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे की नाही हे मला माहित नाही. मी त्याच्याशी लग्न करू का? मात्र, अद्याप त्याने घटस्फोट सुद्धा घेतलेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

(वाचा :- ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण ठरलं समस्त पुरूष जातीला लाजवेल असा एक भयंकर आरोप..!)

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 7 हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

जाणकारांचे उत्तर

मुंबईतील रिलेशनशिप कौन्सिलर रचना अवत्रामणी सांगतात की, “सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे आहे का? तुम्हाला त्याच्याबद्दल काही भावना आहेत का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे लग्न फार काळ टिकले नाही, त्यानंतर तुमचा घटस्फोट झाला. आणि आता तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जी तुमच्यावर खूप प्रेम करते. मात्र तो विवाहित असून त्याला एक मूल आहे. मात्र, त्याचे पत्नीशी चांगले संबंध नाहीत. तुम्हाला विश्वास आहे का की त्याच्या सोबत तुमचे लग्न झले तर तुमचे लग्न टिकेल? तुमचे त्याच्याशी पटेल? या गोष्टी तुम्ही स्वत: सुद्धा स्वत:ला विचारून मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे.”

(वाचा :- माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय, मी घटस्फोट घेणं योग्य ठरेल का?)

संवाद साधावा लागेल

त्या पुढे म्हणतात की, “तुमच्या बोलण्यातून मी इतकं समजू शकते की तुमची सुद्धा त्याच्यासोबत आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत, मी म्हणेन की प्रत्येक पैलूवर आपल्या प्रियकराशी बोला. त्यांच्याकडून तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. तिथेच त्याला विचारा की तो या नात्यात तुमच्यासाठी काय करू शकतो. तो तुम्हाला समजून घेऊ शकतो का, सांभाळू शकतो. याची जेव्हा सकारात्मक उत्तरे तुम्हाला मिळतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास टाकू शकता.”

हेही वाचा :  माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण

(वाचा :- कोणालाच नाही अशी घाणेरडी सवय नव-याला आहे, त्या एका सवयीने केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळं, ऐकून येईल अंगावर काटा)

शेवटचा सल्ला

शेवटी आपले बोलणे संपवताना त्या म्हणतात की, “तुमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, मी एवढचं सांगू शकते की घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे प्रत्येकासाठी कठीण असते, याची मला जाणीव आहे. खास करून तेव्हा जेव्हा पदरात मुले असतात. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा याची चांगली जाणीव असेल कारण तुम्ही स्वतः अशाच प्रक्रियेतून गेला आहात. मला हे देखील नमूद करायचे आहे की कोणतेही नाते संपवणे हे आव्हानात्मक असते. पण जर तो त्याच्या वैवाहिक नात्यात आनंदी नसेल तर तो तुमच्यासोबत आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

(वाचा :- मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, आकंठ प्रेम असतानाही का पुसलं गेलं नशिबातून बायकोचं नाव)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्…’, रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले…

Rohit Pawar On Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार (Maharastra Politics) चर्चा …

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. …