फुगा मारल्याचा जाब विचारला, मारहाणीत डोळा थोडक्यात बचावला

उल्हासनगर : देशासह राज्यात तब्बल दोन वर्षांनी होळी साजरी होत आहे. संपूर्ण राज्यात उत्साहाच वातावरण आहे. पण उत्साहाच्या भरात काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पाण्याने भरलेला फुगा मारण्यावर बंदी असतानाही अनेक जण रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर फुगे मारतात. यातून मुली, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचीही सुटका नसते. अनेकवेळा दुर्घटना घडते, अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीला काही मुलांनी बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्य समोर आली आहे.

जयेश गिझलानी हा विद्यार्थी कोचिंग क्लासेसहून घरी जात होता. यावेळी काही मुलं रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांना पाण्याने भरलेले फुगे मारत होते. यातील एका मुलाने जयेशच्या अंगावर फुगा मारला. फुगा का मारला याचा जाब जयेशने विचारला. पण जाब विचारल्याने संतापलेल्या टोळक्यातील एका मुलाने जयेशला बेदम मारहाण केली. 

त्या मुलाने हातातल्या चावीने जयेशला मारहाण केली. यात जयेशचा डोळा थोडक्यात बचावला. पण डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने जयशेला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तरुणाल पकडून पोलीस स्थानकात आणलं. पण धक्कादायक म्हणजे मारहाण करणारा तरुण पोलीसांची नजर चुकवून पोलीस स्थानकातूनच पसार झाला. सध्या पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :  होळीच्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त भांग प्यायलात तर... अस उतरवा हँगओव्हर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …