बिहार बोर्ड इंटरमीडिएट परीक्षा १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान करोना प्रतिबंध नियमांचे पालन करुन ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. इयत्ता बारावीनंतर बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाशी संबंधित नवीनतम माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यावर्षी सायन्स स्ट्रीममध्ये ५ लाख ६७ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३ लाख ८० हजार ६५ मुले आणि १ लाख ८७ हजार ४०८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी २ लाख ६५ हजार २१८ विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये, १ लाख ८२ हजार ९१९ विद्यार्थी द्वितीय, तर ४, ७६४ विद्यार्थी तृतीय विभागात उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत एकूण ४ लाख ५२ हजार ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बिहार बोर्ड इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना थ्योरी आणि प्रात्यक्षिक या दोन्ही पेपरमध्ये किमान गुण मिळणे आवश्यक आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक
इयत्ता बारावीचे विद्यार्थी निकालासंदर्भातील कोणत्याही अडचणीसाठी बिहार बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी ०६१२ २२३०००९ किंवा [email protected], biharboard.ac.in/contact-us वर संपर्क साधू शकतात.